Breaking

शुक्रवार, ६ मे, २०२२

आदिवासीबहुल भागात विजेअभावी तीव्र पाणीटंचाईपळशी,जवरला,आदिवासी कोलामपोड गावातील पाणीपुरवठा खंडित


आदिवासीबहुल भागात विजेअभावी तीव्र पाणीटंचाई

पळशी,जवरला,आदिवासी कोलामपोड गावातील पाणीपुरवठा खंडित

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील पळशीडाग,जवरला,आदिवासी कोलामपोड येथील दोन महिन्यापासून विजेचे रोहित्र (डी.पी) जळाल्या कारणाने येथील गावात पाणीपुरवठा बंद आहे.यासंदर्भात दि.५-मे रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यापासून कोसोदूर असणाऱ्या या आदिवासी पाड्यातील नागरिकांना आपल्या मुलाबाळांना घेऊन रखरखत्या उन्हात २ ते ३ कि.मी अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.यासंदर्भात जवरला ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना वेळोवेळी पाण्याच्या समस्या विषयी ग्रामस्थांनी विनंती करून सुद्धा ते याकडे दुर्लक्ष व टाळाटाळ करीत आहेत.विजेचे रोहित्र (डी.पी) बसवण्या संदर्भात गावकऱ्यांनी महावितरणचे इंजिनियर व गावातील संबंधित लाईनमन यांना सुद्धा वारंवार भेटून त्यांना विनंती करून सुद्धा विजेची समस्या दूर झाली नाही.

आदिवासीबहुल भागातील या तीनही गावाचा विजेअभावी बंद असलेला पाणीपुरवठा  चालू करून आम्हाला सहकार्य करावे आशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांना सादर केले आहे.निवेदनाची दखल न घेतल्यास विजे अभावी तीव्र पाणीटंचाई संदर्भात आम्हाला उपोषणा शिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही.असे ही गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर लक्ष्मण आत्राम,किसन आत्राम,मोतिराम आत्राम,श्यामराव आत्राम,नामदेव आश्रम,लक्ष्मण टेकाम,बापुराव आत्राम,ज्ञानेश्वर टेकाम,सुरेश आत्राम,संतोष आत्राम, आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा