भुरकवडीकरांचा आदर्श इतर गावानी घ्यावा - माजी आ. प्रभाकर घार्गे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
गेल्या ३० वर्षाची ग्रामपंचायत, सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा भुरकवडी ग्रामस्थांनी कायम ठेवली असून सलग सहाव्यांदा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून षटकार मारला आहे. हा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा असे प्रतिपादन सातारा-सांगली विधान परिषदेचे माजी आमदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रभाकर घार्गेसाहेब यांनी भुरकवडी येथे केले.
भुरकवडी ता. खटाव येथील विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. श्री. घार्गे साहेब पुढे म्हणाले, ग्रामस्थांच्या एकजूटीतून ग्रामपंचायतीसह सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला असून नवीन संचालकांनी सातारा जिल्हा बँकेच्या नवनवीन योजना आमलात आणून सोसायटीच्या माध्यमातून गावचा विकास साधावा असे आवाहन केले. यावेळी विकास अधिकारी जयवंत गोडसे, सरपंच ललिता कदम, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस के कदम सर, पत्रकार शरदराव कदम, छगन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बिनविरोध निवड झालेले चेअरमन दिलीप कदम, व्हा चेअरमन साहेबराव कदम, संचालक शिवाजी कदम, जालीदर कदम, तानाजी कदम, धनाजी कदम, शहाजी कदम, श्रीमंत कदम, लता कदम, कैकई चव्हाण यांचा तर आयएसओ मानकंन प्राप्त केल्याबददल रेशनिंग दुकानदार दादासो पाटील व स्वर्गीय केशवराव पाटील खटाव सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबददल भुरकवडी सोसायटीचे सचिव असलम पठाण यांचा सत्कार श्री घार्गे साहेबांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार कैलासराव जाधव यांनी मानले. यावेळी मधुकर कदम, मनोज कदम, दिलीप कदम, कॅप्टन हणमंत कदम, अरूण फडतरे, हिंदूराव चव्हाण, बाळासो कदम, अंकुश लावंड, हणमंत कदम, विजय फडतरे, प्रविण कदम, नामदेव कदम, गजानन गाढवे आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
भुरकवडी - सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार करताना आ.प्रभाकर घार्गे व इतर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा