Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

पुरवठा अधिकारी साळुंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडुन तक्रार दाखल..!


पुरवठा अधिकारी साळुंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडुन तक्रार दाखल..!


श्रीगोंदा-नितीन रोही,

 तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील कर्मचारी दत्तात्रय साळुंके (पुरवठा अधिकारी) यांच्या नागरिकांच्या कामाबाबत येणाऱ्या तक्रारीबाबत तहसीलदार  मिलिंद कुलथे साहेबांना संदिप उमाप यांनी तक्रार निवेदन दिले असून त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदीप उमाप हे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यांच्याकडे तहसील कार्यालयातील कामानिमित्त लोक येत असतात. लोकांची कामे वेळेत व्हावीत म्हणून ते नेहमी योग्य मार्गाने पाठपुरावा करत असतात तसेच कामानिमित्ताने आलेल्या लोकांच्या अडचणी तक्रारी सोडवण्यास प्राधान्य देत असतात.परंतु श्रीगोंदा तहसील मधील पुरवठा शाखेतील पुरवठा अधिकारी दत्तात्रय साळुंके त्यांच्याकडे कामानिमित्त येणाऱ्या लोकांशी व्यवस्थित बोलत नाहीत, त्यांना योग्य माहिती देत नाहीत,तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करून दंडेलशाहीच्या भाषेत बोलतात व लोकांची कामे वेळेत करत नाहीत असे संदीप उमाप यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.
  सदर बाबतीत बऱ्याच लोकांच्या तक्रारी संदिप उमाप यांच्याकडे आलेल्या आहेत.अशाच एका व्यक्तीच्या कामाबाबत ते पुरवठा अधिकारी साळुंके यांनी रेशनकार्ड वर नाव कमी केलेले दाखवले होते परंतु जेव्हा संबंधित रजिस्टर मा तहसीलदार साहेबांचे समक्ष पडताळणी केली असता त्या रजिस्टरवर अशी नाव कमी केले बाबत कोणती नोंद असल्याचे दिसून आले नाही.अशाप्रकारे त्या वेळेस देखील साळुंके यांचा कारभार तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिला होता त्यावर तहसीलदार साहेबांनी योग्य ती दखल घेतो असे देखील सांगितले व संबंधित साळुंखे यांना समज देखील दिलेली होती.
परंतु त्यानंतर देखील साळुंके यांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. संदीप उमाप हे १६/०६/२०२२ रोजी तहसिल कार्यालयात कामानिमित्त पुरवठा शाखेत साळुंके यांच्याकडे गेले असता साळुंके यांनी मागील प्रकरणाचा राग मनात धरून त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत वार्तालाप केला तसेच तू माझे काहीही वाकडे करू शकत नाही मी देखील इथलाच आहे माझ्यापासून जपून राहा असे म्हणून दमबाजी केली.
श्रीगोंदा पुरवठा अधिकारी दत्तात्रय साळुंके हे कामानिमित्त येणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करून अरेरावीची भाषा वापरून सरकारी काम वेळेत करत नसून लोकांना वारंवार चकरा मारण्यात भाग पाडतात व कामे व्यवस्थित करत नाहीत याबाबत वारंवार तक्रारीदेखील केलेल्या आहेत.परंतु साळुंके यांच्या वागण्यात काहीएक बदल झालेला नाही तसेच वरील प्रमाणे उल्लेख केल्यानुसार साळुंके यांनी राग मनात धरुन उमाप यांना काल  सायंकाळी ४.३० वाजता दमबाजी केली आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात उमाप यांनी म्हटले आहे. 
साळुंके यांची लवकरच बदली करून चांगला अधिकारी त्यांच्या जागी नेमु असे  तहसीलदार यांनी निवेदन स्विकारताना सांगितले.
 निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरीदास आबा शिर्के,राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष गोरख तात्या घोडके,सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष राहुल बागे, सामाजिक न्याय विभागाचे शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा संघटक आकाश भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सोशल मीडिया अध्यक्ष सचिन खामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते जयेश देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष कार्तिक घोडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिपक साळवे, युवा नेते शिवराज ताडे, योगेश खामकर,ऋषिकेश शेलार, यश होले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा