आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांनी केले मुस्लिम समाजाला आवाहन
करमाळा प्रतिनिधी
येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकत्र येत आहे
आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम समाजाची बकरी ईद येत असल्यामुळे मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसरे दिवशी कुर्बानी करून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे
महाराष्ट्र ही सुफी व संतांची भूमी असून आजही या महाराष्ट्र राज्यात हिंदू मुस्लिम एकोपा पद्धतीने राहतात हिंदू बांधव मुस्लिमांच्या तर मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणांमध्ये एकत्रित येतात अशा या महाराष्ट्राची एकतेची संस्कृती जपणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे गुण्या गोविंदाने राहतात
संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरला पांडुरंगाची आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा असते आणि हया यात्रेला महाराष्ट्रातुन पंधरा ते वीस दिवसांपासून पायी चालत वारकरी आप आपल्या दिंडीत मोठया भक्तिभावाने पंढरपूर ला विठ्रठलाच्या दर्शनासाठी जातात आणि समाजाची बांधिलकी म्हणून सर्व धर्म समभागाची भावना ठेवून सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न करता दुसरे दिवशी कुर्बानी करावी व उभ्या महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण करावा असे तांबोळी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा