संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां लढविणार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : परिवर्तनवादी विचार व आक्रमक सामाजिक संघटना असलेली संभाजी ब्रिगेड राजकारणात सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या नांदेड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती निवडणुका संभाजी ब्रिगेड लढविणार आहे.
यशवंतराव चव्हाण वस्तिगृह नवा मोंढा नांदेड येथे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांची महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या धर्तीवर जिल्ह्यातील तालुक्याचा आढावा घेण्यात आला.यावेळी नव्वद नव्यांणव ग्रुप चे संस्थापक मारोती मेंडेवाड यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह संभाजी ब्रिगेड मधे प्रवेश केला त्यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्याचबरोबर लोकसभा सचिव पदी दिपक भरकड, लोकसभा संघटकपदी परमेश्वर खोसे,उत्तर जिल्हा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील शिंदे, उत्तर जिल्हा संघटकपदी कैलास पवळे,जिल्हा उपाध्यक्ष पदी संतोष सवराते, जिल्हा कार्याध्यक्षपदी अंकुश कोल्हे, दक्षिण जिल्हा संघटकपदी बालाजी जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हाउपाध्यक्षपदी शिवम कदम, तालुका उपाध्यक्ष पदी संदीप पूयड,देगलुर तालुक्यातील करडखेड सर्कल प्रमुखपदी ज्ञानेश्वर हंगरगे आदींची निवड करण्यात आली.नांदेड जिल्ह्यातील संपुर्ण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागा संभाजी ब्रिगेड ताकदिनीशी लढणार असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी यावेळी मांडले.संभाजी ब्रिगेड कडुन लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेण्यात येतील असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांनी मत व्यक्त केले.
बहुजन तरूणांचे सशक्त संघटन उभे करून तरूण शेतकरी यांच्यासाठी आक्रमक आंदोलन करणारी संभाजी ब्रिगेड जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करणार आहे. गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता या अभियानामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संभाजी ब्रिगेडने आपले जाळे पसरवले आहे. शेतकऱ्यांच्या व तरूणांच्या विविध प्रश्नावर आंदोलने करत इतिहास व संस्कृतीची नव्याने पुनर्लेखण करणारी संभाजी ब्रिगेड राजकारणात सुद्धा 100 टक्के समाजकारण करणार आहे. नांदेड जिल्हा नेहमीच चळवळीचे केंद्रस्थान राहिला असून संभाजी ब्रिगेडने नांदेडला सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद नेहमीच राज्यभर उमटत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून युवकांच्या, महिलांच्या व शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी संभाजी ब्रिगेडने रेटण्याचा प्रयत्न विविध आंदोलनातून केलेला आहे. पण याची शासनाने जेवढ्या प्रमाणात दखल घ्यावयाची होती तेवढी घेतली नाही त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका संभाजी ब्रिगेड लढवून बहुजनांचे सर्व प्रश्न चांगल्या रितीने सोडवणार आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका लढविणार व जिंकणारही आहे.समविचारी पक्षांनी युतीचा प्रस्ताव दिल्यास केंद्रीय पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे मत संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सचिव परमेश्वर पाटील दिव्यांग जिल्हाध्यक्ष प्रदीप गुबरे,जिल्हा उपाध्यक्ष कमलेश कदम,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट, दिलीप सुगावे, गोविंद ढगे,अनिल दापके, पवन सिरसाट,नितीन कोकाटे,प्रदीप इंगोले,जेजेराव शिंदे,रवी पाटील,प्रध्मुन पाटील, गोविंद कदम,योगेश मोरे,चांदोजी शेजुळे,संजय मिराशे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांच्यासह असंख्य जण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा