हर घर तिरंगा अभियानातून अंगणवाडी महाळुंग गट नंबर दोन येथे जनजागृती.
श्रीपुर प्रतिनिधी, हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 20 कोटी वरून अधिक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये 75 वा सुवर्ण महोत्सव दिन व अमृत सोहळा साजरा करीत असताना देशाच्या प्रत्येक नागरिकांनी घरी तिरंगा लावण्यासाठी आणि फडकविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली देशातील जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे हा या मागचा उद्देश आहे
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेतील प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. देशामध्ये , राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये व प्रत्येक गावामध्ये 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम राबविला जाणार आहे त्या अनुषंगाने माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनायक गुळवे यांनी देखील माळशिरस पंचायत समिती प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिली आहे याचाच एक भाग म्हणून एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा अंतर्गत अंगणवाडी क्रमांक 14 महाळुंग गट नंबर दोन येथे दिनांक 3 ,5, व 9, ऑगस्ट रोजी या कालावधी मध्ये अंगणवाडी येथील लहान मुलांची प्रभात फेरी काढून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानातून आपल्या परिसरामधील नागरिकांना देशभक्तीची जाणीव निर्माण व्हावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन जनजागृती करण्यात येत आहे याप्रसंगी अंगणवाडी महाळुंग गट नंबर 2 च्या सेविका लीलावती निकम व मदतनीस मीनाक्षी काटे अंगणवाडी मधील मुले व मुली उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा