Breaking

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

दरुज, भुरकवडीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात



दरुज, भुरकवडीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात



वडूज प्रतिनिधी 

खटाव तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनेक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. दरुज ता. खटाव येथील ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद शाळा, न्यू इंग्लीश स्कूल यांच्या माध्यमातून शासन नियमानुसार हर घर तिरंगा कार्यक्रम राबवून १३ ऑगस्ट रोजी सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन आनंदराव लावंड , कॅप्टन रंगराव लावंड, १४ ऑगस्ट रोजी इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थीनी  कु.मोनिका लावंड, कु. सानिका आवळे तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सरपंच नंदाताई खामकर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. खावेळी उपसरंपच रोहित लावंड, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन अंकुश पवार, व्हा.चेअरमन सतिश बोटेपाटील, सोसायटीचे सर्व संचालक, दरजाईचे सरपंच संतोष बोटेपाटील, आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
          यावेळी दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीतील ९५ टक्केच्या पुढील गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांस छत्रपती सामाजिक विकास संस्थेच्यावतीने रोख पाच हजार रुपये बक्षिस देण्यात आले. ग्रामपंचायतीच्यावतीने शाळेतील गुणवंत विद्यार्थी व जेष्ठांचा सत्कार, वृक्षारोपन, १५ वित आयोगातून अपंगासाठी खुर्ची वाटप, आरोग्य शिबिर, महिलांसाठी कौशल्य विकास शिबिर राबवणे असे कार्यक्रम घेण्यात आले. इयत्ता १ ली ते ७ वी पर्यतच्या विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप कार्यकारी सरपंच अँड.के.एस.खामकर यांच्या वतीने करण्यात आले.
          तर भुरकवडी ता. खटाव येथेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट ध्वजारोहन कार्यक्रम पार पडले. सरपंच ललिता कदम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. गावातील सेवानिवृत्त पीएसआय रमेश मुगुटराव कदम, माजी सैनिक चंद्रकांत गुण्याबा कदम, माजी सैनिक कृष्णत दादा नवले यांचा सत्कार करण्यात आला. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्याबददल प्रेमकुमार प्रविण कदम, एनएसएससी परिक्षेत राज्यात नववी आलेली कु.अक्षरा सचिन गांधी, इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी कु.वेदांतिका अरविंद कदम, कु. अपूर्वा संतोष कदम, कु.अनुजा शरद कदम, कु.श्रावणी आंधळकर, कु. साक्षी सुर्यवंशी, जिल्हा परिषद शाळेसाठी वृक्षारोपन व रंगरंगोटी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल अशोक वामन कदम तर गावातील प्रत्येक कार्यक्रमात विशेष भाग घेणाऱ्या शिवजंयती उत्सव समितीच्या सदस्यांचा व इतर गुणवंत विद्यार्थांचा सत्कार स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
      यावेळी माजी सरपंच एस के कदम सर, शिवाजीराव कदम, सरपंच ललिता कदम, चेअरमन दिलीप कदम, माजी चेअरमन मधूकर कदम, कॅप्टन हणमंत कदम, दशरथ कदम, ग्रामसेविका सौ.धनश्री गमरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे संचालक, आजी माजी पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले तर आभार मनोज कदम यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा