महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी नागरिकांजवळ साधला संवाद
शासकीय योजनांचा लाभ अन्न प्रक्रिया उद्योग वाढीसाठी करणे गरजेचे –
केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल
महाड – प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आपल्या रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात महाड मध्ये नागरिक आणि विशेषतः लाभार्थ्यांजवळ संवाद साधत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध योजनांची माहिती देताना अन्न प्रक्रिया उद्योगावर भर दिल्यास प्रक्रिया केल्या उत्पादनात वाढ होवून निर्यात क्षमता वाढेल असे मत व्यक्त केले.
केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दिनांक २२ ऑगस्ट २०२२ पासून संवाद दौरा सुरू झाला असून त्यांनी आपल्या दौऱ्यात महाड क्रांतीभूमिला भेट देत याठिकाणी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाड येथील राष्ट्रीय स्मारक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांनी आंबेडकरी अनुयायांशी चर्चा करून केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या योजना आणि राज्य शासनाच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी पुढे आले पाहिजे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान विमा योजना इत्यादी अनेक योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बंधू भगिनी, व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी, आणि तक्रारींचे निवारण करण्यात आले. तसेच त्यांनी या योजना राबविण्यात असलेल्या त्रुटी देखील जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते शेवटच्या टोकाला आलेल्या नागरिकाला देखील लाभ मिळाला पाहिजे. या हेतूने हि संवाद अभियान असल्याचे सांगितले.
कोणतीही योजना राबविताना एखाद्या लाभार्थ्यांचे कागदपत्र घेतले असतील तर दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेताना त्या लाभार्थ्याला पुन्हा पुन्हा तेच कागदपत्रे मागितली जात आहेत ते थांबले पाहिजे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजना यशस्वी रित्या राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील नागरिकांच्या दारोदारी वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळेल याची व्यवस्था करून ती त्या गावातील अत्यंत गरजू व्यक्तीला किंवा कुटुंबाला त्या त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य केले पाहिजे असे मत देखील केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी यावेळी मांडले. यावेळी त्यांनी पत्रकारांजवळ देखील संवाद साधला.
केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी २३ ऑगस्ट रोजी रायगड किल्ल्यावर जावून मेघदंबरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच रायगड किल्ल्यावर असलेल्या महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे दर्शन घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा