Breaking

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

दौंड येथून उजनीत येणार्या विसर्गात वाढ.... ५० हजार क्यूसेक्सने भीमा नदीत पाणी सोडले। .... भीमेची पूरस्थिती कायम....



दौंड येथून उजनीत येणार्या विसर्गात वाढ....
 ५० हजार क्यूसेक्सने भीमा नदीत पाणी सोडले।
   .... भीमेची पूरस्थिती कायम....



 बेंबळे। प्रतिनिधी                   

               रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी पुणे शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा मुठा पवना इंद्रायणी आधी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून खडकवासला व घोड धरणातून बंद केलेला विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे ,याचा परिणाम म्हणजे सोमवारी दुपारी 12 पासून दौंड येथून उजनी धरणात मंदावलेल्या  पाण्याच्या विसर्गात वाढ होऊ लागली आहे व रविवारी सकाळी 21 हजार क्युसेक्स असलेला विसर्ग आता 35हजार क्युसेक्स झालेला आहे व रात्री त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार क्युसेक्स  विसर्गाने पाणी सोडण्यात आलेले आहे जे रविवारी 11 तारखेला सकाळी वीस हजार क्युसेक्स पर्यंत खाली ठेवलेले होते .त्याचप्रमाणे धरणातील पाण्याचे नियंत्रण योग्य प्रकारे सुरू असून दोन दिवसापूर्वी 109% असलेले धरण आज 103% पर्यंत खाली आले आहे कारण पुणे जिल्ह्यात मागील आठवड्यात पाऊस बंद होता, दौंड येथील विसर्ग मंदावला होता तरीपण धरणातून भीमा नदीत 25 ते 30 हजार क्यूसेक्स विसर्गाने पाणी चालूच ठेवले होते. दरम्यान 12 ता.ला वीर मधून निरा नदीत 6 हजार637 क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले असून 13 तारखेला सकाळी सहा वाजेपर्यंत नरसिंहपूर येथून भीमा नदीत 58 ते 60 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी राहणार असे कळवण्यात आले आहे, त्यामुळे भीमा नदीची पूरस्थिती कायम राहणार आहे. सध्या उजनी ची टक्केवारी 103% असून धरणात 119 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे व धरणात येणाऱ्या पाण्यामुळे यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा