पाण्याचा काटकसरीने वापर करत पिकाची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा:- जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे
सिद्धेश्वर शिंदे/प्रतिनिधी बेंबळे।
पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात ज्यास्तीत ज्यास्त उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असुन यापुढील काळात परिसरातील सोमनाथ हुलगे यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून भुमिका बजवावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी बेंबळे ता माढा येथे आयोजित केळी व ऊस पिक पहाणी व शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना केले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे साहेब , सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्रीधर जोशी होते
पुढे बोलताना श्री शिंदे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात दोन लाख तीस हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे परंतु सरासरी हेक्टरी शंभर टनापेक्षा ज्यास्त नाही. शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच ऊस शेती करण्याची गरज आहे तरच शेती फायद्याची ठरेल शेतकऱ्यांनी आपली जमीन, उपलब्ध पाणी हवामान यांचा विचार करून योग्य नियोजन करून आपल्या शेतात विविध पिकांचे भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी सध्या स्थितीमध्ये केळी आणि ऊस ही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारी दोन पिके आहेत शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा अतिरेकी वापर टाळून आपल्याला लागणारी खते स्वतः तयार करावीत यासाठी बेंबळे येथील डाळींब उत्पादक शेतकरी यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केळी उत्पादक संघ स्थापन करण्यात गरज निर्माण झाली होती केळी उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऊस पिकामध्ये एकरी 117 टन ऊस काढल्याबद्दल व ऊस उत्पादक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोमनाथ हुलगे यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच केळी निर्यातदार कृषी भूषण किरण डोके पेरू उत्पादक विजय लबडे तसेच विविध पिकांमध्ये भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान झाला यावेळी कृषी अधिकारी पाटील साहेब व बारामती कृषी विज्ञान केंद्राचे खूपसे साहेब यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली यानंतर सोमनाथ हुलगे यांच्या केळी व ऊस प्लॉटची पाहणी उपस्थित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी केली यावेळी हुलगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत भोसले यांनी केले तर आभार जयवंत भोसले यांनी मानले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्रीधर जोशी,मंडल कृषी अधिकारी कृषी नलवडे निर्यातदार कृषीभुषण किरण डोके, सज्जन आवताडे सचिन जगताप राघवेंद्र कुलकर्णी महेश रामदासी संजय पवार देविदास शिंदे बंडू ताटे गणेश हुलगे तुकाराम वाघमोडे आदीसह महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण विजय लबडे गजेंद्र पोळ, महावीर निंबाळकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा