Breaking

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

निसर्गाच्या सानिध्यात माणूस म्हणून जगत असताना लोंढे दांपत्याने जपली सामाजिक बांधिलकी.



निसर्गाच्या सानिध्यात माणूस म्हणून जगत असताना लोंढे दांपत्याने जपली सामाजिक बांधिलकी.


टेंभुर्णी प्रतिनिधी

 टेंभुर्णी येथील यशवंत लोंढे व त्यांच्या पत्नीअश्विनी लोंढे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आज त्यांच्या राहत्या घरासमोर बगळा हा पक्षी घायाळ होऊन खाली पडला होता. निसर्गाच्या सानिध्यात माणूस म्हणून जगत असताना त्याची जबाबदारी घेत त्यांचे मुख्या पक्षावर असलेली जवळीक व प्रेम दाखवत.


      बगळा या पक्षाचे पंखाचे हाड मोडल्याने त्याला उडता येत नव्हते तो पक्षी खाली पडल्यानंतर तडफडू लागला तेवढ्यात या दांपत्याचे त्याच्याकडे लक्ष गेल्याने त्यांनी लगेच त्याच्याकडे धाव घेतली. त्याला ज्या जागी दुखापत झाली होती तिथे त्यांनी हळद लावून मलमपट्टी केली. त्यांचे घर अकलूज चौक येथे वाघे वस्तीवर श्री स्वामी समर्थ मंदिरा शेजारी असल्याने त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर रोज 40 ते 50 पक्षी येतात व त्यांना हे दाम्पत्य असेल ते धान्य टाकून त्यांना उपासमारी मधून बाहेर काढतात त्यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर दहा ते पंधरा पाण्याच्या बॉटल भरून त्यांना पिण्यासाठी ठेवल्या आहेत.
        ह्या बगळ्याला मलमपट्टी करून त्याला निसर्गाच्या माळरानावर जिथे धोका नसेल अशा ठिकाणी सोडून त्यांनी त्याचे प्राण वाचवले त्यांनी आत्तापर्यंत चार कुत्री,तीन मांजरे, व एक चिमणी, यांना त्यांनी जीवनदान दिले आहे. 
         त्यांना विचारले असता ते म्हणाले की चालत्या बोलत्या व्यक्तीवर कोणीही प्रेम करते परंतु पशु पक्षावर व ज्यांना बोलता येत नाही आशांवर प्रेम करणे हे वेगळेच असते म्हणून त्यांनी ह्या मुक्या पक्षांना जीवदान दिल्याने टेंभुर्णी परिसरा मधून त्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा