Breaking

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

भारत जोडो यात्रेसाठी उस्मानाबाद येथील ५० रणरागिणींचा ताफा झाला रवाना.



भारत जोडो यात्रेसाठी उस्मानाबाद येथील ५० रणरागिणींचा ताफा झाला रवाना.



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.



उस्मानाबाद दि.८ (प्रतिनिधी) - सर्वसामान्यांचे प्रश्न जगासमोर मांडण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा दि.७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. यासाठी उस्मानाबाद येथील काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर यांनी ५० महिला रणरागीणींचा ताफा घेऊन नांदेडकडे रवाना झाल्या आहेत.
यावेळी बोलताना डॉ स्मिता शहापूरकर म्हणाल्या की, सर्वसामान्य जनता त्रासून गेली असून त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस माजी अध्यक्ष खा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असून या यात्रेत लाखो लोक स्वतःहून जोडले जात आहेत.  कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. काल दि.७ नोव्हेंबर रोजी रात्री या यात्रेने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला आहे. आतापर्यंत या यात्रेने १५०० किलोमीटरचा प्रवेश केला असून त्यांच्यासोबत लाखो लोक जोडले गेलेले आहेत. तसेच या यात्रेचे नाव देखील अतिशय समर्पक असून एकीकडे जाती, धर्मामध्ये गटातटामध्ये भेद पाडून राजनीती चाललेली असताना या लोकांना जोडायचे काम सुरू आहे. लोकांचे प्रश्न हे सौहार्दाने व शांततेतून सुटतात हे सांगण्यासाठी राहुल गांधी निघालेले आहेत. सर्व जनतेला, वेगवेगळ्या स्थरातील लोकांना ते खूप उत्साहाने भेटतात भेटतात. लोकांना प्रेम व आपुलकी मिळत आहे. तसेच भारत जोडण्याचे ऐतिहासिक काम ते करीत आहेत. बेरोजगारी महागाई चे प्रश्न महिला वरील अत्याचाराचे प्रश्न जगासमोर मांडत आहेत. एकंदरीतच सगळीकडे जी अनास्था चाललेली आहे. प्रशासनामध्ये जी हेळसांड चाललेली आहे समस्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक जे त्रासून गेले आहेत. त्यांना दिलासा देण्याचे काम गांधी करीत असून या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उस्मानाबाद येथून आम्ही महिला मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी निघालो असल्याचे काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर यांनी सांगितले. यावेळी अलका मगर, शोभा कुंभार, अनिता अदाटे, मनिषा शिंदे, अर्चना पवार, सुरेखा गव्हाणे, साक्षी गव्हाणे, पद्मिनी पिंपळे, मनीषा राठोड, रंजना आडे, मनीषा आडे, कविता राठोड, वंदना चव्हाण, निर्मला आडे, पूजा राठोड, बालिका आडे, शोभा राठोड, रागिनी राठोड, इंदुबाई भराटे, अश्विनी शिंदे, कांचन भालेराव, पंचशीला वाघमारे, रेहमुन्नीसा शेख, रुबिना पठाण, छाया बाबर, रेश्मा शिंदे, साहिल शेख आदीसह ५० महिलांचा ताफा घेऊन रणरागिनी नांदेडकडे रवाना झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा