Breaking

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

राज्यकर्त्यांनी विकासाची स्पर्धा ठेवावी – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर



राज्यकर्त्यांनी विकासाची स्पर्धा ठेवावी – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर


          राज्यात 2019 साली मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 6 महिन्यांमध्ये कोरोनाचे संकट आले व हे संकट दीड वर्ष राहिले. या काळात मा. उध्दव साहेबांनी कुटुंबातील व्यक्ती म्हणुन काटेकोर उपाययोजना करुन अनेक नागरिकांचे प्राण वाचविले व यांच्या कामाचा गौरव जगभर झाला. अनेक अडथळ्यांवर मात करुन महाविकास आघाडी सरकारने राज्यात व जिल्ह्यात अनेक लोक उपयोगी कामे केली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीची प्राधान्यक्रम अट रद्द केली व शहरासाठी महत्वपुर्ण असलेली भुयारी गटारी मार्ग (208.75 कोटी) तसेच 50 वर्षानंतर वाढती लोकसंख्या ग्रहित धरुन उजनी धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविले व जिल्ह्यात व शहरात रस्ते विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिला.
          मात्र महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने कुटील कारस्थान करुन खाली खेचले व या सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे महावितरणचे ट्रान्सफार्मर बसविण्याची कामे थांबविली गेली यामुळे शेतकऱ्यांना ऐन रब्बी हंगामात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना केवळ 8 तास वीज मिळत आहे.     शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेक कामे स्थगित केली. या शासनाच्या निर्णयाने राज्यात व शहरात अनेक विकास कामे खोळंबुन राहिली आहेत. शहरातील दुरावस्था झालेली उद्याने (जिजामाता उद्यान व संभाजी उद्यान) यांना मंजूर झालेला कोट्यावधीचा निधी तसेच आठवडी बाजाराचा विकास ही कामे ह्या सरकारने स्थगित करुन धाराशिव शहरावासिंयांवर अन्याय केला आहे.  त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यांचे सरकार आले म्हणुन विरोधी व द्वेष भावनेतून वागणे हे सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे त्यांनी विरोधाला विरोध म्हणुन सर्वसामान्य जनतेस वेठीस धरु नये असे अवहान खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव शहरातील खालील विकास कामांच्या भुमीपुजन प्रसंगी केले.


            A. रा.मा. 238 ते शिवनारायणी एंटरप्रायजेस ते राज्यमार्ग 52 पर्यंत काँक्रीट, हॉटमिक्स रस्ता व नाली करणे  B. बँक कॉलनी ते NH-52 पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा करणे  C. समर्थ नगर व केशव नगर येथे काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे  D. महात्मा गांधी नगरमध्ये काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे या विकास कामांचे अंदाजित रक्कम रु. 4 कोटी 47 लक्ष किमतीच्या विकास कामांचे भूमिपुजन पार पडले.

            तसेच भाजपा चे जिल्ह्यातील एकमेव आमदार पीकविमा प्रश्नावर फेसबुक ऑनलाईन येवून जनतेला माहिती देतात मात्र त्यांनी 531 कोटी ऐवजी 201 कोटी रुपये विमा कंपनीस नुकसान भरपाई शपथपत्राद्वारे का मागितली ? याचे उत्तर त्यांनी 100 वेळा आव्हाण करुन का दिले नाही हे आधी सांगावे व नंतरच पीकविम्याबाबत ब्र शब्द काढावा. गगनचुंबी, फ्लेक्स, बॅनर, कटआऊट शहरात लावून विकास होत नसतो राजकारण म्हणजे आपल्या जनतेवर सुड उगविणे नव्हे असा टोला उद्घाटन प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लावला.

            याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, पप्पु मुंढे शहर अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, सिद्धेश्वर कोळी सर, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे युवा सेनेचे शहर अध्यक्ष, रोहित निंबाळकर, बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, महेबूब भाई पटेल, गणेश बप्पा खोचरे, बापू साळुंखे, बंडू आदरकर, पंकज पाटील, चेतन वाठवडे, उदय पाटील सत्यजित पडवळ, गफूर शेख, मुजीब काझी, उप अभियंता मोहिते, शाखा अभियंता काळे, दिनेश बंडगर, H M देवकते, विनोद थोडसरे, अगरचंद खोत, सतीश शिंदे, बहिरे अप्पा, धनंजय पाटील, सुधीर पवार, नानासाहेब घाडगे, प्रशांत जगताप यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा