**तेरणा, तावरजा प्रकल्पाचा परिसर हिरवाईने नटवणार*
*लातूर/ प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी* लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा, तावरजा प्रकल्पाचा त्रिमूर्ती अधिकाऱ्यांनी घेतला ध्यास ! अन् करणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विकास करत तेथील परिसर हिरवाईने नटवणार आहेत.
प्राधिकरण कार्यालयाचे प्रमुख अधिक्षक अभियंता व प्रशासक अभिजित म्हेत्रे यांचे नियोजन, क्षेत्रिय कार्यालयचे अभियंता सी.जे. शेख यांचे धडपड व कार्याचे तत्परता सोबत उपविभागीय अधिकारी नितीन बी पाटील यांचे यासाठी योगदान यातून या भागातील या प्रकल्पाचे नाविन्य स्वरूपात व शेतकरी वर्गाच्या हिताची कामे संपवून हा परिसर हिरवाईने नटवला जाणार आहे, हे नक्की आहे.
सिंचनाच्या सुविधा आणि सोयी पासून उपेक्षीत असलेले तेरणाचे लाभक्षेत्र, तसेच तेरणा प्रकल्प माकणी व तेरणा पात्र 100%भरुनही, त्याचा वापर कमी होतो, शेवटच्या शेतकरी लाभधारक यांच्या पर्यंत हे पाणी पोचत नसल्याने या प्रक्रियेतून तो दुरावत चालला असून, त्यास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्राधिकरण कार्यालयाचे प्रमुख अधिक्षक अभियंता व प्रशासक अभिजित म्हेत्रे हे प्रशासकीय कामे थोडे बाजूला ठेवून स्वत क्षेत्रिय तपासणी साठी आपला अतिरिक्त वेळ देत असून, त्यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार यांत्रिकी मंडळाची यंत्रणा यासाठी उपलब्ध करून दिली आहे, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी अतोनात प्रयत्न करत असून, क्षेत्रिय कार्यालयचे शाखा अभियंता सी जे शेख यांच्या कार्यातून डावा कालवा, उजवा कालवा सोबत शहरातील वसाहत सांभाळत व या शासकीय परिसर अतिशय सुंदर आणि आकर्षक असा तयार करुन घेतला असून त्यांना वेळोवेळी वरीष्ठ अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले आहे. अश्या अभियंतास आता यापुढे या सिंचनासह विशेष दुरूस्ती करण्याची व हे अभियान यशस्वी राबिविण्याची जबाबदारी देण्यात येत असून, ते सक्षमपण पार पाडतील अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली.
लाभक्षेत्र विकास, प्राधिकरण लातूर यांना निम्न तेरणा प्रकल्पातून डावा व उजवा कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
शासनाने - प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ पाणी सोडल्यामुळे निम्न तेरणा जलाशय डावा व उजवा कालव्यावरील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा