कामेगाव ग्रामपंचायतवर भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेचा झेंडा
विजयानंतर गावात फटाके, गुलाल उधळन करत जल्लोष साजरा.प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद : तालुक्यातील कामेगाव येथील राजकीयदृष्ट्या महत्वपुर्ण असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत ग्रामपंचायतवर मागील 25 वर्षाची सत्ता उलथावून टाकत परिवर्तन ग्रामविकास पॅनलने बाजी मारली आहे. या पॅनलने सरपंचासह 9 सदस्यापैकी 8 जागेवर विजय मिळवला आहे. विजयानंतर गावात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
कामेगाव ग्रामपंचायतीसाठी 9 सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत जनतेतून सरपंच म्हणून अमिता बालाजी वाघमारे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तर वार्ड क्रमांक एकमधून नितीन बलभिम मोरे, सुनंदा शिवाजी वाघमारे, सुनिता मच्छिंद्रनाथ कदम हे विजयी झाले. वार्ड क्रमांक दोनमध्ये अतितटीची लढत झाली. यामध्ये विद्यमान उपसरपंच नानासाहेब पाटील, मनिषा नामदेव झोर व विरोधी पॅनलमधील अलका टिके या विजयी झाल्या. वार्ड क्रमांक तीनमधून विनोद विजय अवतारे, बिरु महादेव शेवाळे, मिरा राहुल कदम यांचा विजय झाला. या विजयी सर्व उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावात फटाक्याची आतषबाजी गुलालाची उधळन करत जल्लोष करण्यात आला. यावेळी भैरवनाथ पवार, राजाभाऊ कदम, रघुनाथ कदम, बाबु पुरी, युवानेते मनोज पाटील, उदय पाटील, मुकूंद मोरे, हनुमंत कदम, डॉ.विशाल कदम, भैरु मोरे, युवराज पवार, डॉ.प्रकाश वाघमारे, राहुल कदम, सौदागर खांडवे, नामदेव झोरे, सुधीर कदम, मनोज कदम, उध्दव मोरे, चांगदेव कदम, दत्ता खांडवे, दयानंद मोरे, देवानंद मोरे, बालाजी वाघमारे, संजय कसबे, शिवाजी वाघमारे, प्रविण कदम, गोरख कदम, दिनेश कदम, गणेश जाधव, सोहम खांडवे, साहिल खांडवे, विजय कसबे आदींची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा