Breaking

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

ऊस तोडणी मुकादम व मजूर यांच्या फसवणुकी विरुद्ध जिल्ह्यातील साखर कारखानदार संघटितपणे लढणार .... वाहन मालकाला न्याय मिळाला पाहिजे..। आमदार बबनदादा शिंदे .....नऊ सदस्यीय कमिटीची स्थापनाः...।।। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बरोबर विचार विनिमय होणार



ऊस तोडणी मुकादम व मजूर यांच्या फसवणुकी विरुद्ध जिल्ह्यातील साखर कारखानदार संघटितपणे लढणार .... वाहन मालकाला न्याय मिळाला पाहिजे..।


                         आमदार बबनदादा शिंदे            
.....नऊ सदस्यीय कमिटीची स्थापनाः...।।।
 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बरोबर विचार विनिमय होणार


बेंबळे।मुकुंद रामदासी।                 

               ऊस तोडणी.. वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या मुकादम व मजुरांच्या अन्यायकारक वर्तनाला प्रतिबंध होऊन वाहन मालकांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे वतीने एक समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीच्या माध्यमातून वाहन मालकावर मुकादामा कडून होणार्या फसवणुकीबाबत व साखर कारखान्यांच्या इतर अडचणी व प्रश्नाच्या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,साखर आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल अशी ग्वाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे  संस्थापक अध्यक्ष आमदार बबन दादा शिंदे यांनी दिली आहे.
 िठ्ठलराव शिंदे कारखान्यामध्ये संपन्न झालेल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे चेअरमन कार्यकारी संचालक व शेतकी अधिकार्‍यांच्या बैठकीत आमदार शिंदे विचार व्यक्त करत होते. याप्रसंगी जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सर्वश्री राजन पाटील लोकनेते अनगर ,धर्मराज कडांनी सिद्धेश्वर, सिद्धाराम म्हेत्रे अक्कलकोट, सचिन देशमुख लोकमंगल, आमदार संजय मामा शिंदे विठ्ठल शुगर ,उमेश परीचारक, फॅबटेक, कल्याणराव काळे सहकार शिरोमणी, अभिजीत पाटील विठ्ठल, संजय आवताडे, व्हीपी पाटील ,व्हीपी शुगर, शिवाजीराव काळोखे, सिताराम, सतीश जगताप भीमा मोहोळ, रोहित गर्ग श्री श्री शुगर, धनाजी साठे कुर्मदास दादा साठे, दत्ता शिंदे गोकुळ, महेश देशमुख लोकमंगल, शिवानंद पाटील संत दामाजी, संजय आवताडे अवताडे शुगर, आदी मान्यवरासह साखर सहसंचालक पांडुरंग शेळके व करमाळ्याचे डी वाय एस पी विशाल हिरे व्यासपीठावर उपस्थित होते.
      आमदार बबनदादा शिंदे याप्रसंगी म्हणाले की मुकादम व ऊस तोडणी कामगारांनी वाहन मालकांची मागील एक वर्षात 100 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे .साखर कारखाने वाहन मालकाबरोबर तोडणी वाहतुकीचा करार करतात व वाहन मालकास पाच ते सात लाख रुपये ऍडव्हान्स देतात, वाहन मालक मजूर टोळी मुकादमाबरोबर करार करून स्वतःचे जवळचे पैसे घालून आठ दहा लाख रुपये मुकादामाला मजूर टोळीसाठी देतात, परंतु हे मुकादम ऐन वेळेस टोळी न आणता वाहन मालकांची फसवणूक करतात व वाहन मालक शेतकरी यामुळे भरडला जातो, यासाठी मुकादमच्या एकत्रित नोंदी साखर आयुक्तालयाकडे दिल्या पाहिजेत ,सर्व व्यवहार ऑनलाइन झाले पाहिजेत ,प्रत्येक ठिकाणी आरटीजीएस ने किंवा चेक ने पैसे दिले पाहिजेत ,तोडणी मजुराकडील आधार कार्ड नुसार ज्या त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांच्या कडे नोंदी पाहिजेत. गोपीनाथ मुंडे ऊस मजूर महामंडळाला प्रत्येक कारखाना प्रतिटन दहा रुपये देतो परंतु हे महामंडळ फक्त मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचीच सोय पाहते व इतर कुठलीही दखल घेत नाही, त्यामुळे शासनाने देखील या महामंडळाकडे प्रतिदिन दहा रुपये जमा करावेत व एकूण फंडातून फसवणूक झालेल्या वाहन मालकांच्या नुकसानीचा विचार होणे व या शेतकऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, कारण ऊस वाहतूक करणारे  वाहन मालक ही शेतकऱ्यांचीच मुले असतात. जे मुकादम फसवतात त्यांची मुंडे महामंडळाकडे नोंद असावी  व या महामंडळांनेच ऊस तोडणी साठी कारखान्यांना मजूर पुरवठा करावा .फसवणूक करणाऱ्या  मुकादमाविरुद्ध कायदेशीर कारवाई ज्या त्या ठिकाणच्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये व्हावी व यासाठी न्यायालयात वकिलांची नेमणूक करून वाहन मालकांना न्याय मीळावा. स्थानिक हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत पण ते घेतले पाहिजेत, मुकादम व मजूर त्यांच्या गावी जाऊन वाहन मालकावर ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करतात व या संदर्भात वाहन मालकाला तुरुंग  भोगावा लागतो, प्रसंगी काही वाहन मालकांना जीव देखील गमावा लागला आहे. या सर्व गंभीर बाबी संबंधात मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालीच पाहिजे व न्याय मार्ग मिळाला पाहिजे असेही दादांनी सुचवले. ज्या त्या वर्षीच्या एफ आर पी नुसारच ऊसाला दर द्यावा, डिस्टिलरी को जनरेशन या सह उद्योगां बाबतीत येणाऱ्या अडचणी शासन स्तरावरून  सोडवल्या जाव्या व साखर कारखानदारी वाचली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रित संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही मत दादांनी व्यक्त केले.     
            याप्रसंगी राजन पाटील म्हणाले की 70 वर्षाच्या साखर कारखानदारीत पहिल्यांदाच आमदार बबनदादा शिंदे यांनी हा चांगला प्रश्न लावून धरला आहे त्यांना आम्ही मनःपूर्वक पाठिंबा देत आहोत .आतापर्यंत वीस हजार कोटी रुपये या मुकादम व मजूर डोळ्यांनी बुडवले आहेत या विरुद्ध संघटितपणे लढा देऊन शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी शासनाने देखील खंबीरपणे जबाबदारी उचलावी असे मत पाटील यांनी व्यक्त केले. धर्मराज काडादी म्हणाले की संघटितपणे लढण्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे, परंतु गोपीनाथ मुंडे महामंडळाने एकतर्फी खर्चाचा निर्णय न घेता त्याचा शासन स्तरावरून विचार झाला पाहिजे. इथेनॉल वीज निर्मिती संदर्भात कारखान्यांना येणाऱ्या अडचणी बाबत शासनाने तत्परतेने सहकार्य करावे, सर्व वजन काटे ऑनलाइन जरूर करा पण ते कॉम्प्युटरला जोडू नयेत कारण त्याचा डेटा मिळणे अवघड जाते याबाबत ही शासनाने विचार करावा. लोकमंगल चे महेश देशमुख म्हणाले की मुकादम व मजुर यांचे एक ॲप तयार असावे व ही माहिती सर्व साखर कारखान्यांना पुरवण्यात यावी. विठ्ठलचे अभिजीत पाटील यांनी आपले मत मांडताना सांगितले की दूरच्या भागातून मजूर टोळ्या आणल्या जातात त्यांना त्या ठिकाणी ओळखणारा एक शेतकी अधिकारी असावा व करार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, कारण काही मुकादम   दोन.. तीन कारखान्याचे पैसे उचलतात व पळून जातात ,तसेच 50% यंत्रणा पूर्ण झाल्याशिवाय गळीतास परवानगी मिळू नये असेही मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
           साखर सहसंचालक पांडुरंग शेळके म्हणाले की मजूर मुकादामांचे ॲप बनवण्यास मान्यता आहे यासाठी एक मॉडेल ड्राफ्ट तयार करून मजूर तोडी ऐवजी मालक तोडीची सुरुवात करावी ,प्रशासकीय विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. डीवायएसपी विशाल हिरे याप्रसंगी म्हणाले की करारानुसार केलेल्या गुन्ह्याची नोंद कोर्टात टिकत नाही, मजूर हे दूरवरून आलेले असतात व त्यांचे वर  गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर खंबीर सुधारणा करणे आवश्यक आहे, परंतु मी सर्व साखर कारखानदारांच्या भावना वरिष्ठांना कळवतो. यावेळी व्हीबी शुगरचे  पाटील, सिद्धाराम म्हेत्रे कल्याणराव काळे उमेश परिचारक कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी शेतकी अधिकारी राजाभाऊ खटके, व्यवहारे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वर्गीय विठ्ठल भाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन राजन मालक व धर्मराज काडादी यांचे हस्ते करण्यात आले. मजूर टोळी मुकादम व मजुरांनी वाहन मालक प्रशांत भोसले बेंबळे याची हत्या केली त्या वाहन मालकास श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी स्थापन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कमिटी याप्रमाणे..... अध्यक्षा आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे, सदस्य राजन पाटील , व्ही बी पाटील, रोहित गर्ग ,महेश देशमुख ,कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, संतोष डिग्रजे व शेती अधिकारी व्यवहारे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी प्रस्तावना केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर  केन मॅनेजर संभाजी थेटे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा