अखिल भारतीय साहित्य परिषदेचे पत्रकारिता व कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
पत्रकार राजेंद्र गुंड व प्रगतशील शेतकरी शिवशंकर गवळी यांचा झाला सन्मान
माढा / प्रतिनिधी - अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने दिले जाणारे सन-2022 चे विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण झाले असून पत्रकारितेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सर्वगुणसंपन्न पत्रकार राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना "दिनकरराव जवळकर राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार" आणि हटकरवाडीचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार शिवशंकर गवळी यांना "बालाघाट राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार" संमेलनाध्यक्ष तथा इतिहास संशोधक प्रा.शरद गोरे यांच्या हस्ते व राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
पत्रकार राजेंद्र गुंड यांनी सन 2015 पासून पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक,कृषी,राजकीय, क्रिडा व आरोग्य क्षेत्रातील प्रश्न व समस्या लेखनीतून प्रभावी व वस्तुनिष्ठपणे मांडल्या आहेत.त्यांच्या विविध बातम्यांची दखल घेऊन अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत.या बाबींची दखल घेऊन त्यांना साहित्य परिषदेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रगतशील शेतकरी शिवशंकर गवळी यांनी चाळीस एकर क्षेत्रात द्राक्ष व इतर फळबागांचे मागील अनेक वर्षापासून विक्रमी उत्पादन घेतले आहे.शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत त्यांच्या या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषदेचे दुसरे बालाघाट मराठी साहित्य संमेलन तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात साहित्यिक व इतिहास संशोधक शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी माजी मंत्री मधुकर चव्हाण,चेअरमन अनिलकुमार अनभुले,कवी फुलचंद नागटिळक,परमेश्वर पालकर,ज्ञानेश्वर पतंगे,बबन पवार,तानाजी गावडे, विशाल अनुभुले,बालाजी राऊत, किरण गायकवाड यांच्यासह साहित्यिक,कवी,कथाकार,लेखक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी- तुळजापूर येथे राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार साहित्यिक प्रा.शरद गोरे यांच्या हस्ते स्वीकारताना पत्रकार राजेंद्र गुंड व प्रगतशील शेतकरी शिवशंकर गवळी व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा