आ.बबनदादा पाचपुते यांच्या संकल्पनेतून श्रीगोंदा येथे दिनांक 1 ते 5 मार्च 2023 दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन......
श्रीगोंदा-नितीन रोही,
स्पर्धेच्या युगामध्ये शेती व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने केला तरच शेतकरी टिकेल वारंवार पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, हवामानामध्ये सतत होणारे बदल यामुळे शेती व्यवसाय अत्यंत धोक्यात आला आहे या सर्व दुष्ट चक्रामधून आपला शेतकरी वाचला पाहिजेत त्याला आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळाली पाहिजेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी हा मुख्यता ग्रामीण भागामध्ये राहतो या दृष्टिकोनातून माजी मंत्री.आ. बबनदादा पाचपुते यांच्या संकल्पनेतून व नगर दक्षिणचे खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत की, ज्या ठिकाणी भारताच्या सर्व भागातील कृषी व्यवसायिक, धोरणकर्ते, समविचारी व्यक्ती, सरकारी अधिकारी, आणि प्रसार माध्यमे या सर्वांना एकत्र आणून भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य बळकट करण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करत आहोत.
सदर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील सर्व पायाभूत सुविधा, शासकीय योजना, कृषी मार्गदर्शके, यंत्रसामग्री, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सहकार व पणन विभाग तसेच हवामानानुसार शेतीचे मार्गदर्शन, नवीन कृषी अवजारे, हार्वेस्टिंग यंत्रे, जैविक कीटकनाशके, डेरी व्यवस्थापन, मच्छी व्यवसाय, आधुनिक पोल्ट्री, शेळीपालन, शेततळे विषयी माहिती, चर्चासत्रे, कृषी मार्गदर्शन पुस्तके, ठिबक सिंचन, नवनवीन बियाणे यांची माहिती, सोलर उपकरणे, गृह उपयोगी वस्तू प्रदर्शन, बचत गट तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल अशा अनेक उपकरणांची माहिती श्रीगोंदा सह राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये 200 पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात येणार असून वाबळेज इव्हेंट हे या प्रदर्शनाचे नियोजन करणार आहेत तरी दिनांक 1 मार्च 5 मार्च 2023 दरम्यान चालणाऱ्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा व सदर प्रदर्शनामध्ये व्यावसायिकांनीही आपापली उपकरणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावे सदर प्रदर्शनांमध्ये सहभाग घेण्यासाठी 94 23 38 63 26 98 90 86 96 76 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा अशी माहिती मा. आमदार श्री. बबनराव दादा पाचपुते यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रसंगी खासदार सुजय विखे यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर विखे, तहसीलदार श्री. मिलिंद कुलथे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पंचायत समिती बीडीओ राम जगताप, तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब, नगरपालिकेचे मुख्याधिकारी ढोरजकर साहेब, जलसंधारणाचे फरतडे साहेब, महावितरणचे चौगुले साहेब, हर्ष साहेब, लघु पाटबंधारे ठुबे साहेब, पोलीस स्टेशन कोपनर साहेब, वनविभाग पाटील साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग ढोबळे साहेब, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष पती सुधीर खेडकर,नगरसेवक रमेश लाढाणे,गटनेते बापूशेठ गोरे, नगरसेवक अशोक खेंडके, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, संजय खेतमाळीस, अंबादास औटी, संतोष शिरसागर, संग्राम घोडके,भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे, मिलिंद दरेकर, उमेश बोरुडे,जेष्ठ नेते दादाराम ढवण, संतोष दरेकर,श्रीगोंदा सोसायटी चेरमन अशोकराव आळेकर, बाळासाहेब गांधी,कांतीलाल खेतमाळीस,वाबळेज इव्हेंटचे अजय वाबळे यांच्या सह अधिकारी पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा