Breaking

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

केंद्रातील सरकार सुड बुद्धीने काम करत आहे,लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेस च्या पाठीशी रहा..डॉ. धवलसिंह मोहिते पाटील.



केंद्रातील सरकार सुड बुद्धीने काम करत आहे,लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेस च्या पाठीशी रहा..डॉ. धवलसिंह मोहिते पाटील. 


टेंभुर्णी.प्रतिनिधी
 काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते मा.राहुलजी गांधी* यांच्यावर चुकीचे आरोप लावून त्यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेधार्थ *माढा तालुका काँग्रेस कमिटी* यांच्यावतीने  जय भारत सत्याग्रह सभेचे आयोजन केले होते.यावेळी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी बेरोजगारी,महागाई,भ्रष्टाचार आदी विषयावर केंद्र सरकारवर टीका केली.
भारत जोडो यात्रे मधे राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या 3700 km पाई
 पदयात्रे मध्ये अनेक लोकांशी संवाद साधला.लोकांचे प्रश्न अडचणी समजून घेतल्या.दरम्यानच्या काळात संसदेच्या अधिवेशनात आदानी उद्योग समूह ला 20000 कोटी रु ची मदत केली हा प्रश्न उपस्थित केला. उद्विंग्न झालेल्या मोदी सरकारने त्यांची जुन्या कोर्ट केस मधे अडकवून त्यांची खासदारकी रद्द केली.केंद्र सरकार त्यांचा विरोधात बोलणाऱ्या नेते मंडळींचा केंद्रीय तपास यंत्रणा चा दुरुपयोग करून आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. गोर गरीब ,शेतकरी शेतमजूर ,व्यावसायिक आणि समाजातील सर्व घटकांना  पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी काँग्रेस च्या पाठीशी राहण्याचे आव्हान मोहिते पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस चे  नूतन माढा तालुका अध्यक्ष श्री.ऋषिकेश बोबडे यांनी केले.यावेळी विजयकुमार हत्तुरे,दादासाहेब साठे, दिपक खोचरे यांची ही भाषणे झाली.
स्वागत सूत्र संचलन आणि आभार काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस दिपक खोचरे यांनी केले.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस चे वरीष्ठ उपाध्यक्ष श्री.विजयकुमार हत्तुरे, तालुक्याचे नेते मा.श्री.दादासाहेब साठे,ज्येष्ठ नेते मा.मोहनराव आपा बोबडे.डॉ सयाजी देशमुख, किशोर नाळे,टेंभुर्णी चे माजी उपसरपंच धंनजय गोंधील,
काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस दिपकराव खोचरे,
जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक चोपडे, श्री.राधाकृष्ण पाटील, जिल्हा संघटक श्री.हरीभाऊ मंगवडे, युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर वाघ, श्री.चंद्रकांत कांबळे, ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.अरविंद जगताप, श्री.तानाजी माने, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.जहीर मणेर, अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष श्री.रफीक शेख, कुर्डुवाडी शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हमीद शिकलकर, 
पपू ताबे,इम्रान बागवान,हरून शेख ,फिरोज ताबोळी,किरण देशमुख, सोमनाथ देशमुख, निखिल दळवी,पपु क्षीरसागर, आशिफ रास्तापुरे, नाना बारवे,श्याम गवळी,वामनराव नवले,विठ्ठल नवले,विठ्ठल साळुंखे आदी उपस्थित होते. टेंभुर्णी शहरा आणि परिसरातील काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्तेही व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा