शिक्षकांचा आक्रोश मोर्चा"
मा.आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे जुनी पेंन्शन साठी आक्रोश मोर्चा.
भिमानगर प्रतिनिधी
तमाम महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नेमणूक असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन पासून शासनाने वंचित ठेवले .त्यामुळे तीन मे पासून सुरू झालेल्या शिक्षक मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि ोल्हापूरच्या आजर्यापासून
ते गडचिरोली पर्यंत असणाऱ्या तमाम शिक्षकांनी आझाद मैदानावर एकच आक्रोश मांडला आहे. या आक्रोशाला माननीय माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब तसेच त्यांचे चिरंजीव आमदार सत्यजित तांबे साहेब पुरंदर हवेली चे आमदार माननीय जगताप साहेब आणि विद्यमान शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनीही या आंदोलनाला भेट दिली आहे.
महाराष्ट्रातील पेन्शन मागणाऱ्या सगळ्या एकत्रित संघटनांना माननीय आमदार सावंत सरांनी एकत्र आणून एक समन्वय समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आझाद मैदान येथे "आक्रोश मोर्चा "काढला आहे .या मोर्चाचा आजचा सातवा दिवस होता, पण तरीही पेन्शनच्या मुद्द्यावरून एकही शिक्षक मागे हटायला तयार नाही .जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. या मानसिकतेतून सर्व शिक्षकांनी घरदार सोडून मुलाबाळांना सोडून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत ."अभी नही तो कभी नही, एकच मिशन जुनी पेन्शन" या घोषणेने संपूर्ण आझाद मैदान दणाणून सोडले आहे.
या आंदोलनाला समन्वय समितीचे शिलेदार माननीय समाधान घाडगे सर श्री शिवाजी चव्हाण सर श्री जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर सर श्री प्रमोद देशमुख सर संचालक तसेच माननीय तुकाराम बेनके सर श्री शेंडगे बापू श्री सरदार नदाफ सर श्री सुनील भोर सर श्री कल्याणराव बर्डे सर श्री शंकर वडने सर तसेच श्री बंडु जाधव सर श्री आसबे सर श्री सुरेश गुंड सर श्री बाबा पाटील सर असे तमाम हजारो शिक्षक आझाद मैदानात आक्रोश करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा