'मराठा वनवास यात्रेचे' सोलापूर नगरी मध्ये स्थानिकांकडून फुले उधळून स्वागत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी तुळजापूर ते मुंबई असा जवळपास 500 किलोमीटर चा पायी प्रवास करत ही वनवास यात्रा निघाली आहे. गावोगावी संविधान आणि आरक्षण बाबत जनजागृती करत ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.
आज तिसऱ्या दिवशीचा मुक्काम सोलापूर येथील रूपा भवानी मंदिर येथे असणार आहे. उद्या दिनांक 09 रोजी सकाळी 7 वाजता रूपा भवानी मंदिरातून प्रस्थान होईल. रूपा भवानी मंदिर ते माणिक चौक ते चौपाड विठ्ठल मंदिर ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढे संभाजी महाराज पुतळा असे जी यात्रा शहरातून मार्गक्रमण करणार आहे.
सोलापूर येथून मराठा वनवास यात्रा पुढे कोंडी येथे मुक्कामी असणार आहे. अशी माहिती योगेश केदार यांनी दिली. या यात्रेत प्रतापसिंह कांचन पाटील, सुनील नागणे, तात्या महाराज लोमटे, राजेंद्र कमलाकर शिंदे, श्याम माळी, महेश केदार, विशाल सावंत, विजय घायतिडक, जयराज वडने, प्रशांत नागमोडे, बाळासाहेब माने, अण्णा शिंदे, नितीन लोमटे, अमर मुळे, अतुल गवळी, व इतर सहकारी सहभागी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा