उपविभागीय अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रहार चे उपोषण माघे....
श्रीगोंदा- नितीन रोही,
तालुक्यातील देऊळगाव- भानगाव शिवरस्ताचे डांबरीकरणाचे काम पूरर्ण झाले परंतु सदरचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असुन सदरचा रस्ता हा लवकरच उखडू शकतो.
रस्ताच्या साईडपट्ट्या ह्या मुरुमाने न भरता दगडाने भरलेल्या आहेत. कोणतेही काम पक्के व चांगल्या दर्जाचे झाले नसल्याचे संबंधित ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु त्यांनी आमचे काहीही ऐकून घेतले नाही. नकारात्मक भूमिका दर्शवली.
सदरचे काम इस्टीमेट नुसार झालेले नसुन सदरच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित कामांची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व इंजिनीअर यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी प्रहारचे दि.8/05/230 पासुन सुरु केले होते.
उपविभागीय अधिकारी श्री सुरेश काराळे यांनी पंधरा दिवसांत चौकशी करुन कारवाई करु असे लेखी आश्वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित करण्यात आले.उपोषणास प्रहारचे मा.तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर,
मा.शहराध्यक्ष माधव बनसुडे, प्रहारचे संतोष उर्फ गुरु गायकवाड, अमोल कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रहार वाहन चालकचे सचिन गोंटे, अपंग संघटनेचे अध्यक्ष राजेद्र पोकळे, सुरेश गलांडे,ज्ञानदेव कांबळे सह ग्रामस्थ बसले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा