Breaking

सोमवार, ८ मे, २०२३

काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आत्तापर्यंत देशाला दिलेले योगदान जनतेपर्यंत जाऊन पोहाचवण्याचे काम काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्त्याने करावे.... पटोले*



*काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आत्तापर्यंत देशाला दिलेले योगदान जनतेपर्यंत जाऊन पोहाचवण्याचे काम काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्त्याने करावे.... पटोले*


प्रतिनिधी | टेंभुर्णी गणेश चौगूले 

काँग्रेसने जनतेचा उपयोगासाठी तयार करून ठेवलेल्या संस्था भाजपा उद्योगपतींना विकत असून, भारतीय सेना देखील खाजगीकरण करण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असून देशातील जनतेची सुरक्षा धोक्यात आली असून
काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आत्तापर्यंत देशाला दिलेले योगदान जनतेपर्यंत जाऊन पोहाचवण्याचे काम काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्त्याने करावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. टेंभुर्णी येथे माढा ता. काँग्रेसचा वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यसपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. आ. धनाजी साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हा उपाध्यक्षा मीनलताई साठे, प्रदेश प्रवक्ते, काकासाहेब कुलकर्णी, दादासाहेब साठे,युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शाहुराजे जगताप,गीताताई देशमुख,कल्पनाताई जगदाळे,करमाळा तालुकाध्यक्ष प्रताप जगताप आदी उपस्थीत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस पुन्हा भरारी घेईल, देशाला महासत्ता बनवण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता चांगले केलेल्या कामाचा प्रसार करू शकला नाही. देशात पुन्हा कॉग्रेसच्या जागा निवडून येतील. संविधानाला व देशाला वाचवण्याचे काम काँग्रेस करू शकते नरेंद्र मोदिंची फेकूगीरी तरूणांचा लक्षात आले आहे. स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले लागू केले नाही संविधान संपुष्टात आणण्याचे काम मोदी ने केले. मोदी कदाचित जनतेचा मताचा अधिकार सुध्दा काढून घेतील अशी परस्थीती निर्माण झाली आहे. पदाधिकारी यांनी संघटनात्म काम लोकांपर्यंत पोहचणे गरजे आहे. पंचायत समिती, जि.प.पातळीवर पदाधिकारी निवडणुकीत कार्यकर्ता म्हणून जनतेत पोहचला पाहिजे, सर्वजण मिळून कॉंग्रेस पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न करा, स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविणार, नवीन पिढीला संधी द्या प्रामाणिक पणे काम करणारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याअध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुक काँग्रेस पक्षा च्याच चिन्हावर लढविणार 
दादासाहेब साठे म्हणाले माढा तालुक्याला गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, तालुक्यातील शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले व.
माढा नगराध्यक्ष मीनलताई साठे म्हणाल्या काँग्रेसने देशासाठी दिलेले योगदान वीसरता येणार नाही, सर्व समाजाला समावून घेण्याची कॉंग्रेस भूमिका, तालुक्यातील कार्यकर्त्यांचे रक्त कॉंग्रेसमय आहे.यावेळी नुतन तालुकाध्यक्ष म्हणाले येणारी टेंभुर्णी नगरपंचायत काँग्रेस च्या चिन्हावर निवडणूक लढवणार काँग्रेस मोदी सरकारने वाढवलेली महागाई विरोधात जनतेत रोष असल्याचे ते म्हाणाले
प्रास्ताविक माढा तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे, सुत्रसंचलन दिपक खोचरे, आभार शाहुराजे जगताप यांनी मानले यावेळी 
काकासाहेब कुलकर्णी,विजय हत्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी टेंभुर्णी व तालुक्यातील कॉग्रेस वर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक व युवावर्ग मोठ्या सखेने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा