Breaking

सोमवार, ३ जुलै, २०२३

संघटन बांधणी व धोरणात्मक निर्णयासाठी शिंदे गटाची उद्या तातडीची बैठक



संघटन बांधणी व धोरणात्मक निर्णयासाठी शिंदे गटाची उद्या तातडीची बैठक


मुंबई (मिलिंद माने). राज्यात रविवारी झालेल्या राजकीय भूकंपानंतर तसेच शिंदे घाटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात डावल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फुट व आगामी राजकीय घडामोडी च्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याने शिंदे गटाने रामटेक या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली असल्याचे पत्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले आहे

मागील वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे फडणवीस यांच्याबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली व मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले मात्र मागील वर्षभरापासून शिंदे घाटातील आमदारांना मंत्री पदाचे गाजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार दिले जात आहे त्यातच शिंदे व फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर देखील मंत्री करण्याबाबत ठोस तारीख मिळालेली नसल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर लागली दुसऱ्या दिवशी राज्यात राजकीय भूकंप झाला व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये त्यांच्यासहित न आमदारांना घेऊन सरकारमध्ये सामील झाले व उपमुख्यमंत्रीपदा पुन्हा पदरात पाडून घेतले
राज्यात राजकीय भूकंप झाला असताना व शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्याने अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत या पार्श्वभूमीवर शिंदे गटात फूट पडण्याबाबत विविध राजकीय पक्षांकडून मते व्यक्त केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी कोर कमिटीची बैठक आयोजित केली असून या बैठकीत उपस्थित राहावे असे पत्र दीपक केसरकर यांनी कोर कमिटीच्या सदस्यांना काढले आहे
मुंबईतील मलबार हिल येथील रामटेक या शासकीय निवासस्थानी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कोर कमिटी समन्वय समितीची बैठक होणार असून या बैठकीत खासदार गजानन कीर्तिकर हे प्रमुख मार्गदर्शक असून शिवसेना पक्षाची संघटना बांधणी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही तातडीची बैठक आयोजित केली असल्याचे पत्र दीपक केसरकर यांनी काढले आहे
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या समन्वय समितीच्या बैठकीसाठी खासदार गजानन कीर्तिकर ,माजी खासदार आनंदराव अडसूळ,खासदार प्रतापराव जाधव, खासदार भावना गवळी, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे,. शिवसेना नेते रामदास कदम ,राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ ,. पक्ष प्रतोद भरत गोगावले यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे

राज्यातील राजकीय भूकंपानंतर. शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून या असंतोचा भडका उडण्यापूर्वी शिंदे गटातील आमदारांना पुन्हा एकदा कोर कमिटीच्या माध्यमातून शांत राहण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो
राज्यातील राजकीय भूकंपानंतर शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद हवे असल्यास भाजपा पक्षात विलीन वा असा दिल्लीवरून मेसेज दिल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे शिंदे गटातील आमदार याबाबत कसे सांगावे यासाठी तर ही समन्वय समितीची  बैठक आयोजित केल्याचे बोलले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा