अतिरिक्त पावसाच्या नुकसान भरपाईचे 14 कोटी रुपये शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। ....आमदार बबनदादा शिंदे
बेबळे ।प्रतिनिधी।
सन 2022 च्या पावसाळी हंगामात सप्टेंबर 22 मध्ये निकषाबाहेर झालेल्या पावसामुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेला नुकसानीचे 22 कोटी रुपये मंजुरी पैकी आठ कोटी रुपये निधी एक महिन्यापूर्वी शासनाकडून आलेला होता व माढा महसूल विभागामार्फत त्याचे वाटप संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले होते, राहीलेले 14 कोटी रुपये नुकसान भरपाई शासनाकडून सध्या आलेली असून शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर पासून सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. या नुकसान भरपाई मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री ना.अजीतदादा पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले .
वृत्तांत असा की मागील 2022 च्या पावसाळ्यात सप्टेंबर 22 मध्ये निकषाबाहेर झालेल्या पावसामुळे माढा तालुक्यातील अंजनगाव (खे), भेंड, भोसरे, भुइंजे, घाटणे, खैरेवाडी, कुंभेज, कुर्डू ,कुर्डूवाडी ,माढा ,तडवळे ,उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, विठ्ठलवाडी, वडाचीवाडी ( अं. उ.), वडाचीवाडी (माढा) व वाकाव येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे, जमिनीचे,व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते, व कृषी व महसूल विभागाने अशा नुकसानीचे पंचनामे केले होते परंतु याबाबत वरिष्ठाकडे प्रस्ताव दाखल करताना तत्कालीन तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथानपणामुळे वेळेवर योग्य माहिती शासनापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अशा पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम माढा वगळता इतर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली , परंतु माढा तालुक्यातील शेतकरी मात्र या नुकसान भरपाई पासून वंचित राहिले होते. यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे कडे सातत्यानेपाठपुरावा केल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन या नुकसान भरपाईसाठी माढा तालुक्यास 22 कोटी रुपये मंजूर केले होते व यापैकी आठ कोटी रुपये मिळाले होते व माढा तहसील कार्यालयामार्फत संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते . उर्वरित 14 कोटी रुपये दहा ते पंधरा दिवसात निश्चित येतील असेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले होते., यासाठी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी अतिशय तत्परता दाखवून आवश्यक कागदपत्रे शासनाकडे सादर केली व आता ते राहिलेले 14 कोटी रुपये रक्कम शासनाकडून मिळाली आहे व शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर पासून संबंधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
चौकट...
अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड ,पॅन कार्ड , बँक खाते नंबर, मोबाईल नंबर यामध्ये चुका व अपुरे पणा जाणवत आहे, अशा शेतकऱ्यांनी तातडीने बँकेत चौकशी करून आपली के.वाय.सी पूर्ण करून घ्यावी म्हणजे बँक खात्यात पैसे जमा करण्यास अडचण येणार नाही असे आव्हान माढाचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा