Breaking

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात पाटील गट बाजी मारणार, सोळा पैकी दहा ग्रामपंचायतीवर पाटील गटाचा दावा*


*ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात पाटील गट बाजी मारणार, सोळा पैकी दहा ग्रामपंचायतीवर पाटील गटाचा दावा*


 करमाळा प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात माजी आमदार नारायण पाटील गट आघाडीवर असणार, दहा ग्रामपंचायतीवर विजय मिळवू असा दावा माजी आमदार नारायण पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, कंदर, केम, निंभोरे, 
घोटी, गौंडरे, रावगाव, विट, कोर्टी, उंदरगाव, राजुरी, केतुर, कावळवाडी, भगतवाडी व रामवाडी या सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचार संहिता लागू झाली आहे. माजी आमदार नारायण पाटील गटाने सर्वात प्रथम ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला. यावेळी अधिक बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृत्वावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास टिकून आहे. मागील तीन टप्प्यांमध्ये  ग्रामपंचायत निवडणुकात पाटील गटाने बाजी मारून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थपित केली होती  तसेच पाटील गटाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते.तर जनतेतून सरपंच पदावरही पाटील गटाचे कार्यकर्ते आणि खास करून मोठ्या संख्येने महिला रणरागिणी विजयी झाल्या. या सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुध्दा पाटील गटाचा झेंडा सर्वाधिक ग्रामपंचायतीवर फडकेल. माजी आमदार नारायण पाटील हे 24 तास जनतेच्या सेवेसाठी वेळ देणारे नेते असून सत्ता असो वा नसो जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते क्रियाशील असल्याने याचा फायदा निवडणुकीत निश्चितच होणार आहे. करमाळा तालुक्यातील सन 2014 ते 2019 मधील विकास कामे लोकांना ठळक दिसून येतात तर याउलट 2019 नंतर ठप्प असलेली विकासकामे मतदारांना अडचणी निर्माण करत आहेत.याचे पडसाद अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत सुध्दा उमटल्याशिवाय राहणार नाहीत. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटातील सर्व पदाधिकारी व गावोगावचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या तयारीला लागले असून याचा एकत्रीत चांगला परिणाम निवडणूक निकालात दिसून येईल असा आत्मिश्वास प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बोलून दाखवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा