उजनी कालव्यातून पिण्यासाठी सोडलेले पाणी बंद... करकंब परिसर व आष्टी तलावावर अवलंबून असलेल्या गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न सध्या मिटला ...।आ. बबन दादा शिंदे
.....उजनी टक्केवारीचे काउंटडाऊन सुरू ..
... .
बेबळे। प्रतिनिधी। फोटो
आमदार बबनदादा शिंदे यांनी करकंब टॅंक व आष्टी तलावात पिण्यासाठी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात यावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सातत्याने आग्रही मागणी केली होती व या पाठपुराव्यास यश येऊन 17 ऑक्टोबर पासून 1 हजार500 क्युसेक्स ने कालव्यात पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते ते आज 21 ऑक्टोबर रोजी बंद करण्यात आले, कारण करकंब टॅंक पूर्ण भरला तर आष्टी तलाव 60 ते 65 टक्के क्षमतेने भरल्यामुळे करकंब परिसरातील नागरिक तसेच आष्टी तलावावर अवलंबून असलेली शेटफळ, बावी, माढा यासारखी आठ गावे व अनेक वाड्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटलेला आहे. सध्या उजनी धरणाचा काउंटडाऊन चालू आहे, 16 ऑक्टोबर रोजी
60. 66% टक्क्यावर स्थिर झालेला उजनीतील पाणीसाठा आज 21 ऑक्टोबर रोजी 58.57% पर्यंत खाली आला आहे. सध्या सिना माढा 333 क्यूसेक्स व दहीगाव 120 क्युसेक्स विसर्ग गाने सिंचन योजना चालू आहेत चालू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा