उजनीच्या पाणी पातळीत कमालीची घट...
****जिल्ह्यावर जलसंकट येण्याची भीती..**
...कालवा, बोगदा व सिंचन योजना 31 डिसेंबर पर्यंत चालू राहणार.......
*****26डिसेंबरलासोलापूरसाठीपाणीसुटणार***.
....5 जानेवारी 24 पासून उजनी 'मायनस' मध्ये येण्याची शक्यता....
...मृत पाणी साठ्यातून फेब्रुवारी 24 मध्ये शेतीसाठी दुसरे आवर्तन सुटणार
***15 मार्च ते 15 जून 24 पर्यंत जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई **
बेंबळे ।प्रतिनिधी मुकुंद रामदासी
2023 च्या पावसाळ्यात सोलापूर व पुणे जिल्ह्यात सर्वत्र कमी पाऊस झाल्यामुळे उजनी धरणात पुणे परिसरातून 15 ऑक्टोबर 23 पर्यंत फक्त 60.66% पाणी साठा उपलब्ध झाला.सध्या रब्बीच्या पहिल्या आवर्तनासाठी सर्व स्तरातून चालू असलेल्या विसर्गामुळे व जलाशयातून होणाऱ्या प्रचंड उपशामुळे दिवसेंदिवस पाणी पातळीत कमालीची घट होऊ लागली आहे, पर्यायाने आगामी 2024 च्या उन्हाळी हंगामात सोलापूर जिल्ह्यावर मोठे जलसंकट येण्याची चिन्हे निश्चित दिसून येत आहेत, यामुळे शेतकऱ्यासहित सामान्य नागरिक देखील भविष्यकाळाचा विचार करून धास्तावलेला दिसून येत आहे .
मागील 2022 च्या पावसाळ्यात 15 ऑक्टोबर 22 रोजी उजनी धरतात 123.28 टीएमसी पाणी होते तर पाण्याची टक्केवारी 111.23 टक्के अशी होती. यावर्षी 2023 ला 15 ऑक्टोबरला फक्त 60.66 टक्के पाणी व 92 टीएमसी पाणीसाठा होता . कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार एक नोव्हेंबर 23 पासून शेतीसाठी कालवा, भीमा-सीना बोगदा ( सीना नदीत),सीना-माढा व दहिगाव सिंचन योजना चालू होऊन शेतीसाठी रब्बीचे पहिले आवर्तन सुरू आहे व फेब्रुवारी 24 मध्ये रब्बीचे दुसरे आवर्तन सोडणे तारेवरची कसरत ठरणार आहे.
.......शेतीसाठी रब्बीच्या पहिल्या आवर्तनात 30 नोव्हेंबर 23 पर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन असताना सध्या कालव्याच्या शेवटच्या कांही किलोमीटर परिसरातून ('टेल अेंड') सर्वत्र पाण्याची मागणी वाढल्याने डिसेंबर 25 ते 27पर्यंत कालवा ,बोगदा, भीमा सीना जोड कालवा व दोन्ही सिंचन योजना चालूच ठेवण्यात येणार आहेत.कालव्याद्वारे एकरूक आणि आष्टी व करकंब पाणी तलाव भरून घेण्याचे नियोजन असल्यामुळे 14 डिसेंबर पासून कालव्यातील पाणी 2500 क्युसेक्स कमी वरून 1000 क्युसेक्स प्रवाही सोडण्यास येत आहे, तसेच भीमा सीना जोड कालव्यातून सीना नदीत 840 क्युसेक्स, सीना माढा सिंचन योजनेतून 315 क्युसेक्स व दहिगाव मधून 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे व हे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत निश्चित चालू राहील परंतु त्यानंतर मात्र पाण्याची पातळी खालावून गेल्यामुळे शेतीसाठीच्या कोणत्याच विसर्ग स्त्रोताला पाणी मिळणार नाही ही वस्तुस्थिती धरण नियंत्रण विभागाने कळवली आहे.
सध्या पाण्याची टक्केवारी 23 % आहे तर एकूण पाणीसाठा 76 टीएमसी आहे व जिवंत पाणीसाठा फक्त 12 टीएमसी राहिलेला आहे, धरणातील पाणी पातळी 491 मीटर पासून खाली 'मायनस'(- ऊणे) गृहीत धरली जाते. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता जानेवारी २४च्या पहिल्याच आठवड्यात (5 जानेवारी पर्यंत) उजनी धरण 'मायनस' मध्ये येणार असे धरण नियंत्रण विभागाकडून खात्रीशीर समजते व त्यापुढे मृतपाणीसाठ्याचाच वापर करावा लागणार आहे हे निश्चित.
27 डिसेंबर 23 पासून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाच टीएमसी पाणी नदीत सोडण्यात येणार आहे ,त्यामुळे कालव्याच्या दरवाज्यावरील पाण्याच्या दाबाचा विचार करून तातडीने फेब्रुवारी२४च्या पहिल्याच आठवड्यात शेतीसाठी रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असून ते साधारण दोन किंवा तीन मार्चपर्यंत चालेल, परंतु या आवर्तनाच्या वेळेस पाण्याचा दाब कमी असण्याची वस्तुस्थिती निर्माण होणार आहे असा धरण नियंत्रणविभागाचा अंदाज आहे .
......एकंदरीत 15 मार्च ते 15 जून २४ पर्यंत पुढील उन्हाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला भीषण पाणी टंचाई जाणवणार हे निश्चित. उजनी लाभक्षेत्रातील लाखो एकर पिके जळून जातील, सीना नदी तसेच तलाव, नाले, विहिरी कोरड्या पडतील, कोणत्याही सिंचन योजनेला पाणी मिळणार नाही, सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट बनणार आहे व त्यामुळे शेतकऱ्यासहित सर्वसामान्य नागरिक आतापासूनच भविष्यकाळाच्या चिंतेने पूर्णपणे धास्तावून गेलेला दिसत आहे .20 24 च्या उन्हाळ्यात या भीषण जल संकटाला कसे तोंड द्यायचे याबद्दल शासन व प्रशासनाची कसोटी लागणार आहे हे निश्चित.
...15 डिसेंबर 23 ,उजनीच्या पाण्याची स्थिती...
....पाणी पातळी 492.115 मीटर
...एकूण साठा 2153 दशलक्ष घनमीटर
. ..............76 टीएम टीएमसी
...उपयुक्त साठा 350.12 दशलक्ष घनमीटर
...............12.02 टीएमसी
......टक्केवारी 23%
....धरणातून पाण्याचा विसर्ग.....
....कालवा 01 हजार क्युसेक्स
...बोगदा 840 क्युसेक्स
भीमा सीना जोड कालवा( बोगदा )८४०क्युसेक्स
..सीना माढा सिंचन योजना 315 क्युसेक्स
..दहीगाव सिंचन योजना 100 क्युसेक्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा