Breaking

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

शुssक शुssक..., चल की, येतोय का?,...फक्त पाचशे रुपये ..!* *टेंभुर्णीच्या बायपास रोडवर चालतोय जोमाने वेश्या व्यवसाय*



*शुssक शुssक..., चल की, येतोय का?,...फक्त पाचशे रुपये ..!*

 *टेंभुर्णीच्या बायपास रोडवर चालतोय जोमाने वेश्या व्यवसाय*


*टेंभुर्णी प्रतिनिधी/

शुssक शुssक..., चल की, येतोय का?,...फक्त पाचशे रुपये ..!, असा स्त्री चा आवाज ऐकल्यावर माणूस आपसूक वळून पहातो. पहिल्यावर ओठांच्या हालचाली विक्षिप्त पणे करत खुणावतात. आणि गिऱ्याईक शोधण्याचे कामं काही जण इमाने इतबारे करताहेत. हे दृश्य आहे 


सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर! सायंकाळी सहा वाजल्यानंतर, सूर्य मावळतीला गेल्यावर हॉटेल अनुक्षा लॉज व टेंभुर्णी बायपास तर टेंभुर्णी बायपास, लक्ष्मी पार्क रस्त्यापासून ते हॉटेल श्री लॉज पर्यंत या वेश्याव्यवसायाचा व टेंभुर्णी व मोहोळच्या एजंटाचा हा प्रताप चालू असल्याचे समजते. या राष्ट्रीय महामार्गावर अनेक चांगल्या हॉटेल आहेत मात्र या व्यवसायामुळे या हॉटेलची बदनामी होऊ लागली आहे आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर दोन्ही साईडला तीन ते चार महिला उभा असतात प्रत्येक वाहनचालकाला अश्लील चाळे करून खुणावत असतात. हे बघून एकदा मोटर सायकल वाला दमान घेऊन बायकांकडे पाहत असला तर त्याला म्हणतात अय, शुक शुक येतोय का, फक्त पाचशे रुपयात आजच्या दिवस तुझ्यासाठी कमी रेट असे म्हणून मोटर वाहन चालकालाही व मोटरसायकल वाल्यांनाही राष्ट्रीय महामार्गावरती उभा राहिलेल्या महिला विचारत आहेत त्या पण बिनधास्तपणे जेणेकरून टेंभुर्णी पोलीस ठाण्याने त्यांना रस्त्याला उभा राहून वेश्या व्यवसाय करायचे परवानगी दिली आहे असे वाटते कारण आज तीन ते चार महिने झाले या ठिकाणी सायंकाळी सहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत

 या महिलांचा प्रताप चालू असतो मात्र यांच्या वरती दोन एजंट असल्याचे समजते एक एजंट टेंभुर्णी शहरात राहत आहे तर दुसरा मोहोळ येथील येऊन जाऊन करत असल्याचेही समजते. या महिला खूणवत अनेक प्रतिष्टीत पुरुषांना भुरळ पाडून वेश्या व्यवसाय करून घेतात. मात्र तो पैसा यांच्यावरती वाचून दोन मोटरसायकलवर असलेले तरुण पैसे घेऊन त्यांच्याजवळ होत असल्याचे समजते आणि सकाळी त्यांचा हिशोब होतो. त्यामुळे हे दोघेजण त्या महिलांचे एजंट असल्याचे नागरिकांतून दबक्या आवाजात बोलले जात आहे. तरी या विषयावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालक व मोटरसायकल स्वार या महिलांनी अश्लील चाळे केल्यामुळे अचानक त्यांच्याकडे लक्ष गेल्याने अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर या ठिकाणी अपघात घडला तर याला जबाबदार कोण?याबाबत तातडीने टेंभुर्णी पोलिसांनी दखल घेऊन या ठिकाणी चालणारा व्यवसाय बंद करण्याची सर्वसामान्य नागरिकांतुन मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा