Breaking

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य केल्याने टेंभुर्णीमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने पेढे वाटून फटाके उडवून व गुलालाची उधळन करून आनंदोत्सव*


मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य केल्याने टेंभुर्णीमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने पेढे वाटून फटाके उडवून व गुलालाची उधळन करून आनंदोत्सव*



टेंभुर्णी/ प्रतिनिधी 

  : मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून राज्य सरकारने अध्यादेश काढल्याचे समजताच टेंभुर्णीतील सकल मराठा समाजाच्यावतीने एकच जल्लोष केला. टेंभुर्णीतील करमाळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पेढे वाटून  तसेच फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची उधळन करून आनंदोत्सव साजरा केला.


टेंभुर्णीतील करमाळा चौकात सकाळी नऊ वाजता सकल मराठा समाजाचे औदुंबर महाडिक-देशमुख, सचिन जगताप, नेते संजय कोकाटे,तुकाराम ढवळे , प्राचार्य डॉ.महेंद्र कदम, भारत पाटील(अकोलेखुर्द), योगेश बोबडे, दत्तात्रय ढवळे,ॲड.मंगेश देशमुख, विजय खटके, चव्हाणवाडी चे हनुमंत चव्हाण, नानासाहेब ढवळे,  हरिभाऊ सटाले, राहुल टिपाले, दादासाहेब पिसाळ, विक्रम पाटील, माऊली महाडिक, सचिन पवार, शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण,दादा पाटील,  तेजस निंबाळकर ,अमोल ढवळे, बाळासाहेब देशमुख, अमोल जाधव, बापूराव देशमुख, नवनाथ जाधव, नागेश बापू खटके,सचिन पाटील, पपेश पाटील, बाळासाहेब अनपट, विलास कोठावळे, प्रा. डाॅ.नेताजी कोकाटे, प्रा.संजय साठे प्रा.राजेंद्र गायकवाड, प्रा. रविंद्र कुनाळे, प्रकाश देशमुख, पिंटू पाटील, पवार सर, किरण कदम, गणेश व्यवहारे, दत्तात्रय कोल्हे, दिपक पाटील,सोमनाथ नलवडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.महेंद्र कदम म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा जागतिक पातळीवर गेला असून एक मोठा समाज रस्त्यावर उतरून किती शांततेच्या मार्गाने लढा उभा करू शकतो याचे आदर्श उदाहरण आहे.  गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या अडचणी होत्या त्या यानिमित्ताने दूर होतील. या आंदोलनाने महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेतून कसा राहू शकतो हे दाखवून दिले आहे.एक सामान्य माणूस काय क्रांती करू शकतो याचे नव उदाहरण मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.

औदुंबर महाडिक-देशमुख म्हणाले की, मराठा समाजाने सामाजिक सलोखा ठेवावा. जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडीयावर करू नयेत. या आरक्षणाचा मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीत उपयोग होईल. 

यावेळी संजय कोकाटे, सचिन जगताप, तुकाराम ढवळे, विजय खटके,रामभाऊ शिंदे भारत पाटील आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी सकल मराठा समाजातर्फे बाळासाहेब अनपट यांचा आंदोलन काळातील सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळन करून उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला नंतर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा