Breaking

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

महावितरण माणूस मरायची वाट बघतंय का ?वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात महाड मध्ये आमरण उपोषण


महावितरण माणूस मरायची वाट बघतंय का ?
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात महाड मध्ये आमरण उपोषण


शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्याच दिवशी महाड तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुक्यातील वारंगी ग्रामस्थांनी आमरण उपोषण प्रारंभ करून शासनाला घरचा आहेर दिला आहे. तालुक्यात अनेक गावात गांजलेले पोल आणि वीज मीटर बदलण्याची मागणी होत असताना देखील हे पोल बदलले जात नसल्याने ग्रामीण भागात नाराजी व्यक्त होत आहे. माणूस मरायची वाट महावितरण बघतेय का असा प्रश्न देखील ग्रामस्थ करत आहेत.
महाड तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला ग्रामीण भागातील जनता अक्षरशः वैतागली असून सकाळी गेलेली लाईट पुन्हा कधी येईल याचा भरोसा नाही, तसेच वाढीव वीज बिल व वीज वितरणातील अनागोंदी कारभारावर देखील नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या गंजलेल्या विद्युत खांबामुळे जनतेच्या जीवाला होणारा धोका पाहता वारंवार पोल बदलण्याची मागणी करून देखील वीज वितरण कंपनी गांभीर्याने घेत नसल्याने वारंगी येथील ग्रामस्थांनी काळ नदी बचाव समितीकडून वीज वितरण कंपनीच्या महाड येथील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास प्रारंभ केला. काळ बचाव समितीचे राघू तांबटकर, निलेश जाधव आणि अन्य कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
महाड तालुक्यात वीज वितरण कंपनीकडे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर वायरमन उपलब्ध नाहीत तसेच अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर व डीपी उघड्यावर असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असताना वीज प्रवाह सुरळीत करण्यात वीज कर्मचाऱ्यांना वारंवार येणारे अपयश मात्र त्या उलट विज बिल वेळेवर भरून देखील एक ते दोन दिवस वीज पुरवठा अभावी अंधारात रात्र काढावी लागत असल्याने ग्रामीण भागातील जनता वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला अक्षरशा कंटाळली आहे. महाड तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून पूर्वकल्पना देऊनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने अखेर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी तालुक्यातील वारंगी येथील ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या महाड येथील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर आमरण उपोषणास प्रारंभ करून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशीच शासनाला घरचा आहेर दिल्याची आहेर दिल्याची चर्चा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आलेल्या अनेक नागरिकांच्या तोंडून ऐकण्यास मिळाली. महाड मधील महावितरण अधिकारी आणि कर्मचारी याबाबत ठोस कार्यवाही करत नसल्याने या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
वारंवार मागणी करून देखील वारंगी आणि परिसरातील गंजलेले विद्युत पोल बदलण्याची मागणी केली जात आहे मात्र याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. या तालुक्याला महावितरणच्या बाबतीती कोणी वालीच नाही – निलेश जाधव उपोषणकर्ता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा