Breaking

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

कुर्डुवाडीतील दोन बेंच न्यायालयाच्या प्रक्रियेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा खेकड्याच्या खोडा घालण्याचा प्रयत्न....* *कुर्डुवाडी,टेंभुर्णी, मोडनिंब परीसरातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया....*


*कुर्डुवाडीतील दोन बेंच न्यायालयाच्या प्रक्रियेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा खेकड्याच्या खोडा घालण्याचा प्रयत्न....*

  *कुर्डुवाडी,टेंभुर्णी, मोडनिंब परीसरातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया....*


   *कोणताही अधिकार नसताना कोर्ट विरोधात मुख्यमंत्र्यांना दिले  पत्र....*


   *गावागावात सावंत बंधूंच्या पिळावळींना गावबंदी....*


    *न्यायालयीन प्रशासकीय पातळीवरील हालचाली प्रगती पथावर....*



कुर्डुवाडी, प्रतिनिधी/ अरुण कोरे (पत्रकार) कुर्डुवाडी


     कुर्डुवाडी येथे दोन बेंच मंजूर न्यायालयासाठी न्यायालय व बार असोसिएशनचे प्रशासकीय पातळीवर संयुक्तपणे हालचाली प्रगतीपथावर असताना राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कुर्डुवाडीत न्यायालय स्थापनेस विरोध करणारे पत्र दिल्याने माढा तालुक्यातील नागरिकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या २ जानेवारी २०२४ च्या पत्रकान्वयेव सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या ४ जानेवारी च्या पत्रकान्वये माढा न्यायालयांने कुर्डुवाडी शहर व परिसरातील विविध सोयींनी युक्त जागेची पहाणी पंधरा दिवसापूर्वी केली होती.तद्दनंतर जिल्हा न्यायालय व माढा न्यायालय यांनी संयुक्तपणे समक्षपणे पहाणी करुन प्रशासकीय पातळीवरील सर्व हालचालींना प्राधान्य देऊन त्या प्रगतीपथावरही ठेवण्यात आल्या आहेत.
      दरम्यान पहिल्या पंधरवड्यात माढेकरांनी कुर्डुवाडीकरांनाविरोध करुन मोर्चा,वकिलांच्या प्रतिमेला जोडे मारा, समाज माध्यमातून अस्लाघ्य भाषेत टीका टिप्पणी आंदोलन आदीं कृती केल्याने न्यायालयीन क्षेत्राला कलंक लागणा-या कृती केल्याने जिल्हा व राज्य भरातील न्यायालयीन क्षेत्रात तीव्र भावना दिसून आल्या.
    तसेच कुर्डुवाडी न्याय हक्क संघर्ष समीती व कुर्डुवाडी नागरी हक्क विकास समितीच्या वतीने विविध बैठका घेऊन एकमताने वकील मंडळीं व न्यालयीन क्षेत्राच्या पाठीशी रहाण्याची भुमिका जाहीरपणे स्पष्ट केली. 
   गेल्या पंधरा दिवसांत माढ्याच्या न्यायालयास कुर्डुवाडीकरांचा कोणताही विरोध नाही त्यांनी विनाकारण टोकाची भूमिका घेऊन राजकारण करु नये अशा विनंत्याही वकील मंडळींकडून करण्यात आल्यानंतर माढेकरांचा विरोधही बराच कमी झालेला असताना राजकीय हेतूने प्रेरित होउन राज्याचे खेकडा व हाफकीन फेम आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री यांनी पत्र क्र.जा.नं.सा.आ./व्ही.आय.पी./नोट/६४/२०२४ दिनांक ३१/१/२०२४ च्या पत्रकान्वये माढ्याचे न्यायालयाचे विभाजन करण्यात येऊ नये असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तालुक्यातील नागरिकांचा कोणताही विरोध नसताना राजकीय हेतूने प्रेरित होउन पत्र दिल्याने सावंत बंधूंच्या नागरिकांच्या हिताच्या विरोधातील कटकारस्थाना बध्दल संपूर्ण तालुक्यातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
   एवढेच नव्हे तर माढा न्यायालयातील बारच्या सर्व वकीलांची पुनश्च सर्वसाधारण बैठक होऊन कुर्डुवाडीत न्यायालय होण्यासाठी शंभराहून अधिक मंडळींनी पाठिंबा दिला आहे तर अवघ्या वीसच्या आत वकीलांचा विरोध आहे.त्यावेळीही ज्येष्ठ वकीलांनी कुर्डुवाडी, टेंभुर्णी मोडनिंब परीसरातील नागरिकांचा व वकील मंडळींचा माढ्यास कोणताही विरोध नाही त्यामुळे ठराव एकमताने पास करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.बरीच माढ्याची वकील मंडळींनीही वादात न पडता गैरहजर रहाणे पसंत केल्याचेही समजते.
    वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने पक्षकार वकील मंडळी याचा वेळ व पैशाचा होणारा अपव्यय टाळावा म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून उच्च न्यायालयाने असा आदेश दिला असल्याने त्यात हस्तक्षेप करण्याचा लोकप्रतिनिधी,मंत्री एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनाही अधिकार नसताना माढेकरांसारखे विनाकारण राजकारण घुसडून अकलेचे तारे तोडू पहात आहेत.
    कुर्डुवाडी हे करमाळा तालुक्यात असून न्यायालयीन क्षेत्र माढ्यास आहे.गेल्या महिनाभरापासून याबाबत विनाकारण होणाऱ्या वादविवादात विद्यमान माढ्याचे आमदार बबनदादा व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी न्यायालयीन प्रशासकीय पातळीवर कोठेही हस्तक्षेप केला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
     अशात फक्त थैलीशाहीच्या जोरावर राजकारण करणारे खेकड्याच्या चालीचे उप-या"सावंत बंधू" यांनी विनाकारण हस्तक्षेप करून नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे.त्याबध्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांतही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.तर अनेक सावंत-शिंदे गटाच्या पदाधिका-नी आम्हाला नागरिकांच्या,न्याय पालीका व वकील मंडळींच्या बाजूनेच रहावे लागेल असं नावे न छापण्याच्या बोलीवर प्रतिक्रिया प्रतिनिधीस दिल्या आहेत.
     नागरिकांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मंत्री सावंतांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र ताबडतोब माघारी घ्यावे अन्यथा त्यांना गावबंदी करावी लागेल व जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा कुर्डुवाडी, टेंभुर्णी,मोडनिंब परीसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा