बंद नलिकेव्दारे बचत होणाऱ्या पाण्याबाबत शासनाचे धोरण निश्चित-
माढा तालुक्यातील सिनामाढा सिंचनयोजनेच्या कार्यक्षेत्राबाहेरील गावांचा समावेश होण्याचा मार्ग सुन आ बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी।
बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे बचत झालेले पाणी कार्य क्षेत्राबाहेरील गावांना देण्याचे धोरण शासनाने निश्चित केल्याने बावी,तुळशी अंबाड पिंपळकुंटे परीते वाडी कुर्डू या गावांना सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती अशी कि बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे बचत झालेल्या पाण्यातून लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत शासनाने, लाक्षक्षेत्राबाहेर पाणी मागणी असल्यास क्षेत्रास असणारी पाण्याची निकड व इतर संबंधित बाबींवर विचार विनिमय व अभ्यास करुन नलिका वितरण प्रणाली धोरणात सुधारणा प्रस्तावित करण्यासाठी दि.19/04/2023 रोजी शासन निर्णयान्वये समिती नेमण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला व त्यानुसार शासनाने शासन निर्णय नुकताच काढला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करत होते.
चौकट....
बावी-तुळशी-कुर्डु,अंबाड, पिंपळखुंटे, परितेवाडी या गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु असून बंद नलिका झाल्याने जे वाचलेले पाणी आहे. ते पाणी वापरण्यास परवानगी मिळाली आहे त्यामुळे आपल्या गावांना पाणी मिळण्यापासूनची आता अडचण दुर झाली आहे.
चौकट -
माढा तालुक्यातील बावी,तुळशी,परितेवाडी,कुर्डू,पिंपळखुंटे, अंबाड हि गावे कायमच दुष्काळी पट्ट्यात येत आहेत. दरवर्षी पडणा-या पावसाच्या पाण्याशिवाय गावांना पाण्याचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही. सिना माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ठिबक सिंचन केल्याने एकुण 372.75 द.लक्ष.घ.मी. एवढी पाण्याची बचत झाली आहे. बचत झालेले पाणी माढा तालुक्यातील बावी,तुळशी,परितेवाडी,कुर्डू, पिंपळखुंटे,अंबाड या गावांना बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे मिळणार असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.,
आ.बबनराव शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा