Breaking

मंगळवार, २ एप्रिल, २०२४

भीमा नदी काठावरील वीज पुरवठा आठ तास करावा .....आमदार बबनदादा शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे मागणी.. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे रवाना




भीमा नदी काठावरील वीज पुरवठा  आठ तास करावा .....आमदार बबनदादा शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे मागणी..
 निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे रवाना 


बेंबळे /प्रतिनिधी                       
   
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यासाठी आठ तास वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने मेलवर पाठवण्यात आलेल्या आहेत.
     सविस्तर वृत्तांत असा की उजनीतून सोडलेल्या पाण्यावर भीमा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण भरलेले आहेत परंतु पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे बंधाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांसाठी पिण्यासाठी व शेतीसाठी म्हणून फक्त दोन तास तर उचेठाण, मीरे- करोळे व इतर बंधाऱ्यावर फक्त चार तास वीज पुरवठा पंढरपूर तालुक्यात सुरू ठेवावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी 26 मार्च 24 रोजी आदेश दिले आहेत, कारण देताना ते म्हणतात की पिण्यासाठी म्हणून पाणी वाचवायचे आहे ,परंतु यापूर्वी असं कधीही झालेलं नाही या वस्तूस्थितीमुळे हजारो एकरातील ऊस फळबागा चारावैरण आदी पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागलेली आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेतीसाठी बंधारा काठावरून पाईपलाईन करून व मोटारी बसवून पाणी घेतले आहे परंतु सध्या वाढत्या उष्णता मानामुळे पाण्या अभावी पिके जळून लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागलेले आहे. आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी व शासनाकडे निदर्शनास आणून दिले आहे की उजनीतून दर 50 दिवसाला शहर व नदी काठावरील गावांसाठी पाणी सोडण्यात येते उजनी सध्या देखील एकूण पाणीसाठा 44 टीएमसी शिल्लक आहे, असे असतानाही बंधाऱ्यातील पाण्यावर याच वर्षी एवढे निर्बंध का...? कारण यावर्षी ापूर्वी अशाच भरलेल्या बंधार्‍यातून ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा उपसा होत असेल तरीही पिण्यासाठी कोणालाच पाणी कमी पडलेले नाही व आता सुद्धा तसेच होणार आहे व होईल, म्हणून  गुरसाळे बंधाऱ्यावरील लाईट किमान सहा तास व इतर बांधावरील लाईट किमान आठ तास  करावी अशी रास्त मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेली असून तातडीने विद्युत पुरवठा सुरू व्हावा अन्यथा याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे  जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने विचार विनिमय करावा.
 चौकट ....
     दुर्दैवाची बाब म्हणजे वीज कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कडक सूचना आलेल्या असून जर एखाद्या ठिकाणी 15 किंवा 20 एचपी ची मोठ्या बागायतदारांची मोटर चालू असेल तर ती मोटार, स्टार्टर, केबल, पेटी जप्त केली जात आहे .विजे अभावी होत असलेली तडफड आणि नदीत भरलेलं बंधाऱ्यातील पाणी पाहून  'शिंक्यावर दही पण दैवत नाही'  अशी अवस्था शेतकऱ्यांची बनलेली आहे.     
           याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विचार करावा व पंढरपूर तालुक्यात भीमा नदी काठावर आठ तास वीज चालू करावी अशी आग्रही मागणी आमदार बबनदादा शिंदे आणि पुन्हा पुन्हा केलेली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा