Breaking

सोमवार, ६ मे, २०२४

अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्याचे जीवन समृद्ध आणि संपन्न बनण्या साठी व देशामध्ये स्मार्ट व्हिलेजेस तयार होण्यासाठी भाजपला विजयी करा ..नामदार नितीन गडकरी

*अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्याचे जीवन समृद्ध आणि संपन्न बनण्या साठी व देशामध्ये स्मार्ट व्हिलेजेस तयार होण्यासाठी भाजपला विजयी करा ..नामदार नितीन गडकरी*


*बेंबळे/प्रतिनिधी.  मुकुंद रामदासी      

                 अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागातील जीवनमान प्रगतीपथावर नेऊन शेतकरी शेत व शेतमजुराचे समृद्ध आणि संपन्न जीवन बनवण्यासाठी व त्याच प्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट व्हिलेज तयार  करण्यासाठी तसेच व हे सर्व स्वप्न साध्य करण्याचा ध्यास घेतलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मोलाचे सहकार्य व साथ देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आपल्या मतदारसंघातील कर्तुत्ववान उमेदवार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ चिन्हापूढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान देशाचे रस्ते वाहतूक विकास  व तंत्रज्ञान मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी टेंभुर्णी येथील जाहीर प्रचार सभेदरम्यान केले आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे रंणजीतभैय्या शिंदे भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे सरपंच सुरज बोबडे प्राध्यापक सुहास पाटील सुहास काका जामगावकर कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे रिपाई अध्यक्ष लोंढे राजकुमार पाटील योगेश पाटील दत्ता जाधव यांचे सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
        केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळेस म्हणाले की सिंचन सुविधा सर्वत्र उपलब्ध करणे हे केंद्र सरकारचे प्रमुख ध्येय आहे, नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाणारे पाणी आडवायचे हजारो सिंचन प्रकल्प तयार करायचे आणि नद्या जोड प्रकल्पाद्वारे  लाखो एकर क्षेत्रासाठी पाणी पुरवायचे व त्याद्वारे शेतकऱ्यांचे जनजीवन सुखी आणि समृद्धी करायचे आमचे ध्येय आहे. उजनी धरणातील गाळ काढणे व पाण्याचा साठा वाढवणे कृष्णा फ्लड डायव्हर्शन आणि निराभिमा यांचे पाणी उजनीत आणून मराठवाडा व परिसरातील इतर भागातील शेतीसाठी उपलब्ध करून देणे, यासाठी करोडो रुपये देण्यासाठी केंद्रशासन तयार आहे. जत, माण, खटाव या तालुक्यात सध्या मागील पाच वर्षात कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत, काही योजनांची कामे चालू आहेत तर काही प्रगती पदावर आहेत. त्याचप्रमाणे माढा करमाळा पंढरपूर माळशिरस या तालुक्यात देखील शेतीसाठी पाणी अपुरे पडणार नाही यासाठी अनेक सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे हो यासाठी हजारो कोटीचा निधी दिलेला आहे भविष्यात देखील निधी देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. नामदार नितीन गडकरी पुढे म्हणाले की उसापासून इथेनॉल, बायोगॅस ,ग्रीन हायड्रोजन तसेच वीज निर्मिती असे सह उद्योग साखर कारखान्यात आहेत , वीज ,इथेनॉल, बी हेवी इथेनॉल, बायोगॅस ,ग्रीन हायड्रोजन इंधन शासनाला विकले जात आहे. सध्या तांदूळ आणि  गव्हाच्या भुस्कटा  पासून डांबर देखील तयार करण्यात येत आहे ,म्हणजे भविष्यात शेतकरी नुसता अन्नदाता राहणार नसून इथेनॉल दाता, भीम हायड्रोजन गॅस इंधन दाता व डांबर पुरवठा करणारा  एक औद्योगिक घटक म्हणून ओळखला जाईल. शेती साठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर सर्व उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू करणे आणि तरुणांच्या हाताला काम देणे व त्याद्वारे शेतीचा विकास साधून उत्पादनात वाढ होणे आणि ग्रामीण भागातील युवक त्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचे राहणीमान स्वीकारून आर्थिक उन्नती करताना भविष्यात दिसून येणार आहे.  इथेनॉल व सीएनजी वर चालणारे तसेच इलेक्ट्रिसिटी वर चालणारे मोटरसायकल बाईक, फोर व्हीलर व यापुढे ट्रॅक्टर्स व विमानात देखील हे इंधन वापरण्यात येणार आहे व हे सर्व काही मी प्रयोगांती सिद्ध करून दाखवत आहे व या सर्व प्रयोगासाठी हजारो कोटी रुपये केंद्र शासन खर्च करण्यास मागे पाहत नाही. रासायनिक खते शेतीला सध्या परवडत नाहीत म्हणून नॅनो युरिया, नॅनो डीएपी यासारखी विद्राव्य खतांची ड्रोन यंत्रणे मार्फत फवारणी करून शेतीला कमी खर्चात  भरघोस उत्पादन मिळत आहे. या व इतर अनेक अत्याधुनिक बाबींचा विचार करता  आगामी दहा वर्षातील काळ महत्त्वाचा ठरणार आहे  व यामुळे भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस गतिमान होत असून जगात तिसऱ्या नंबरच्या स्थानावर जाण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे ,भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे रूपांतर आर्थिक उन्नती साधण्यांमध्ये होणार हे निश्चित . या प्रकारे देशात  सर्वत्र उन्नती प्रगती आणि कृषी औद्योगिक क्रांती घडवून आणत असतानाच भारत हा विश्वात सर्वार्थाने सर्वश्रेष्ठ देश बनवण्याचे मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी व त्यांना साथ देण्यासाठी आपण सर्वांनी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना  प्रचंड मतांनी विजयी करावे असे आव्हान गडकरी यांनी प्रचंड सभेत बोलताना केले.
                  याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे म्हणाले की खासदार निंबाळकर हे एक प्रतिभावान, विचारवंत आणि अभ्यासू संसद सदस्य आहेत ,त्यांनी या मतदार संघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये मांडलेले आहेत,रेल्वे, रस्ते, पाण्याची टंचाई ,याबाबतीत  हजारो कोटी रुपयांचा निधी त्यांनी या मतदार संघासाठी आणला असून भविष्यात देखील ते अतिशय यशस्वी रित्या आपली जबाबदारी सांभाळतील म्हणून आपण सर्वांनी त्यांना विजयी करावे.

 खासदार निंबाळकर याप्रसंगी म्हणाले की मी जनतेचा सेवक म्हणून या पाच वर्षात मतदार संघात विकास कामे केली व यासाठी मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नामदार नितीन गडकरी व राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेसह  अनेकांचे सहकार्य लाभले. आमच्या समोरचे उमेदवार गुंड , अत्याचारी, व गुन्हेगारी प्रवृत्तीचे व दहशत निर्माण करून स्वार्थ साधणारे असे आहेत, तेव्हा आपण पूर्ण विचारांती मागील प्रमाणेच यावेळीही मला कमळ या चित्रा पुढील बटन दाबून विजयी करावे एवढी विनंती आहे.
         याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांनी उजनी धरणातील गाळ काढणे, कृष्णा फ्लड डायवर्षन योजना आणि निराभिमा योजना कार्यान्वित करणे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची दोन तीर्थक्षेत्र जोडणारा 122 किलोमीटर तुळजापूर शिंगणापूर महत्त्वाचा रस्ताआणि याचबरोबर मतदारसंघातील मोठे रस्ते तयार व्हावेत यासाठी निधी मिळावा अशी मागणी करून आम्ही खासदार निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची परकष्टा करत आहोत आणि ते निश्चित विजयी होतील  असा ठाम विश्वास दादांनी व्यक्त केला .
             या कार्यक्रमाप्रसंगी तुकाराम  ढवळे शंभू मोरे नागेश खटके दिलीप भोसले शिवाजी पाटील चांदजकर संजय पाटील भिमानगरकर भाजपा तालुका  अध्यक्ष योगेश बोबडे महिला अध्यक्षा प्रतीक्षा गोफणे बाळासाहेब ढगे विनायक चौगुले आदी मान्यवरांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे प्राध्यापक सुहास पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन सुहास काका जामगावकर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे रिपाई अध्यक्ष लोंढे तसेच राजकुमार पाटील योगेश पाटील दत्ता जाधव आणि प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हॉइस चेअरमन सुहास काका पाटील जामगावकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा